मुंबई / नगर सह्याद्री –
प्रशांत महासागरात एल निनो सक्रिय झाल्याची घोषणा सीपीसी अर्थात क्लायमेट प्रेडीक्शन सेंटरने केली आहे. यंदा १९५० नंतरचा सर्वाधिक तीव्र ‘एल निनो’ राहण्याचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे. एल निनो डिसेंबरमध्ये अति तीव्र होऊ शकतो असा अंदाज देखील आहे. २०२७ च्या पूर्वार्धातही ‘एल निनो’ सक्रिय असेल असा कयास बांधला जात आहे. प्रशांत महासागरातील न्यूट्रल स्थिती जाऊन एल निनो निर्माण झाल्याची घोषणा अमेरिकी हवामानशास्त्र संस्था नोआच्या क्लायमेट प्रेडिक्शन (सीपीसी) सेंटरने गुरुवारी केली. डिसेंबरपर्यंत एल निनोची तीव्रता अतितीव्र स्वरूपाची होणार असून, यंदाचा एल निनो १९५० पासूनच्या नोंदींमधील सर्वाधिक तीव्र ठरण्याची शक्यता सीपीसीने वर्तवली आहे. सीपीसीने गुरुवारी जारी केलेल्या अंदाजानुसार, गेल्या महिनाभरात एल निनोची स्थिती विकसित झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यंदाचा एल निनो फेब्रुवारी २०२७ मध्येही सक्रिय राहण्याची शक्यता ९० टक्क्यांहून जास्त असल्याचे सीपीसीच्या अंदाजात म्हटले आहे.
प्रशांत महासागरात एलनिनो सक्रिय झाल्याची घोषणा करण्यात आली आहे. सीपीसी अर्थात क्लायमेट प्रेडिक्शन सेंटरनं ही घोषणा केली
आहे. यंदा 1950 नंतरचा सर्वाधिक तीव्र असा एल निनो राहण्याचा अंदाज वर्तवला जातोय. एल निनो डिसेंबरमध्ये अति तीव्र होऊ शकतो असाही अंदाज असेल, 2027 च्या पूर्वार्धातही एलनेनो सक्रिय असेल असा कयास बांधला जातोय आणि अर्थातच या एल निनोचा मोठा परिणाम हा मान्सूनवर होतोय आणि त्यामुळे महाराष्ट्राला देखील त्याचा फटका बसू शकतो, सरासरी पेक्षा यंदा कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे,एल निनोचा प्रभाव वाढतोय, त्याची वाटचाल सुरू झालेली आहे कसे परिणाम होऊ शकतात,एल निनोचे खास करून मान्सूनवर, या प्रश्नावरती माहिती देताना हवामान अभ्यासक मयुरेश प्रभुणे यांनी सांगितलं की, सीपीसीने अधिकृतपणे सांगितलं आपण आधीपासूनच म्हणत होतो की एमनो जून मध्ये सक्रिय होणार पण आता आता गेल्या महिन्याभरातला प्रशांत महासागराच तापमान पाहून सीपीसीने कालच जाहीर केलं की, एल निनो सक्रिय झालेला आहे. याची तीव्रता उत्तरोत्तर वाढत जाणार आहे आणि ते डिसेंबर पर्यंत सर्वाधिक राहण्याची शक्यता आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
1950 पासूनचा हा सर्वात तीव्र एल निनो राहण्याची शक्यता
एल निनोचे वेगवेगळे टप्पे असतात, म्हणजे तीव्र, अतितीव्र जसा मध्ये आपण सुपर एल निनो असं पण एक संज्ञा वापरली जात होती. अतितीव्र स्वरूपामध्ये म्हणजे तिथलं तापमान हे सरासरी पेक्षा दोन ते अडीच अंशापर्यंत जास्त राहण्याची शक्यता आहे, बऱ्याच जणांनी सांगितलं होतं की तीन अंशापर्यंत पर्यंत राहू शकत त्या त्यापेक्षा पण जास्त राहू शकत पण सीपीसीच्या अंदाजामध्ये तसं दाखवण्यात आलेल नाही, पण तरी सुद्धा 1950 पासूनचा हा सर्वात तीव्र एल निनो राहण्याची शक्यता आहे जेव्हा तीव्र एल निनो असतो तेव्हा त्याचे परिणाम जगामध्ये ज्या ज्या पद्धतीने असतात,तर ते हमखास होतात असं आतापर्यंतच्या याच्यावरून जे काही नोंदी आहेत त्याच्यावरून दिसून आले. त्याच्यापैकी भारत किंवा भारतीय उपखंडावरचा जो त्याचा परिणाम असतो, तो म्हणजे या भागामधला सरासरीपेक्षा पाऊस कमी होत असतो, अर्थात तो पाऊस होतच नाही असं नाही पण तो कमी होतो आणि स्वाभाविकपणे त्याला धरूनच ते अपेक्षित धरून आय एमडीने पण वर्तवले की यंदाचा पावसा सरासरी पेक्षा 90% पर्यंत राहू शकतो, पण त्यामध्ये सुद्धा आपण 5% कमी अधिक धरलेले आहे, त्यामुळे जेव्हा आपण 90% भारतामध्ये पाऊस म्हणतो सरासरीच्या तुलनेमध्ये त्यावेळेस त्याच प्रादेशिक वितरण पण कमी जास्त असतं, त्यामुळे ज्या भागामध्ये पाऊस ऑलरेडी कमी असतो, तिथे आणखीन पण कमी झाला, तर मात्र दुष्काळासारखी स्थिती उद्भवू शकते. एल निनो आता जूनच्या सुरुवातीलाच जाहीर झालाय, की तिथे सक्रिय झालाय त्यामुळे मॉन्सूनच्या प्रगतीपासून जे काही जुलै ऑगस्टमध्ये त्याच्यामध्ये सक्रिय कालखंड असतात, ब्रेक असतात, तर त्याच्यावर सुद्धा एलनिनोचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा संपूर्ण हंगामच एलनिनोच्या प्रभावाखाली राहण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे, अशी माहिती प्रभुणे यांनी दिली आहे.
मॉन्सूनच्या प्रगतीमध्ये हा अडथळा निर्माण होतोय
आधीच पाऊस लांबलेला आहे आणि त्यामुळे त्याचं कारण देखील एल निनो हेच आहे का? यावर उत्तर देताना प्रभुणे म्हणाले की, याचा एक प्रकारे इनडायरेक्टली कारण ते असू शकत, कारण पाऊस पुढे सरकण्यासाठी किंवा सक्रिय होण्यासाठी मेडन जुलियन ऑसिलेशन म्हणजे एमजेओ हा घटक महत्त्वाचा असतो हे ढगांच क्षेत्र असत विषवृत्ताला धरून ते पूर्वेकडे सरकत असतं आणि हे एमजीओ बराच काळ म्हणजे बरेच आठवडेत भारतीय उपखंडावर आलेलच नाही म्हणजे हिंदी महासागरावर आलेल नाहीय आणि ते प्रशांत महासागरावरच सक्रिय आहे, तर एलनिनो विकसित होत असताना एमजीओ त्याच भागावर बराच काळ राहणं, हे एक आपण त्याच्यामधल कनेक्शन धरू शकतो. आता हे क्षेत्र जून अखेरीस जुलैच्या सुरुवातीला भारतीय उपखंडावर येऊ शकतं, असंअंदाजांमध्ये वर्तवण्यात आलेले आहे आणि दुसऱ्या बाजूला या आखादी देशांकडून पण कोरडे वारे आपल्या वातावरणामध्ये येत तर त्यांनी सुद्धा मॉन्सूनची वाटचाल रोखून धरलेली आहे तर त्यामुळेच की मॉन्सूनच्या प्रगतीमध्ये हा अडथळा निर्माण होतोय, आता त्याच्या मागचं कारण जे आहे त्याच्यामध्ये एलिनिनोची महत्त्वाची भूमिका असू शकते, हे आता या ज्यावेळेस जाहीर झालं की एलिनो सक्रिय झाला त्याच्यावरून हे स्पष्ट होतंय अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.
डिसेंबरमध्ये एल निनो अति तीव्र होण्याचा अंदाज
मोदींनी राज्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे निर्माण झालेल्या संधींचा लाभ घेण्याचे आवाहन केले. पंतप्रधानांनी विशेषतः एल निनो परिस्थितीच्या संभाव्य प्रभावाविषयी सावध राहण्याचा इशारा दिला आणि राज्यांनी जलसंधारणांच्या कामांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचे सांगितले. गुरूवारी एल निनो प्रशांत महासागरात सक्रिय झाल्याची घोषणा क्लायमे प्रेडिक्शन सेंटरने केली. डिसेंबर महिन्यात हा एल निनो अति तीव्र होण्याचा अंदाज आहे.
देशातील मॉन्सूनवर याचा परिणाम पडेल. जगभरातून भारताला एल निनोचा इशारा दिला जात आहे. देशातील अनेक राज्य एल निनोच्या कचाट्यात येत आहेत. जिथे मोठा दुष्काळ पडू शकतो. मॉन्सूनचा पाऊस अत्यंत कमी पडण्याचा अंदाज आहे.
मुख्यमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आवाहन
दुसरीकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील एल निनोबाबत शेतकऱ्यांना महत्त्वपूर्ण आवाहन केले आहे. “राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या मार्गदर्शनानुसारच जर शेतकऱ्यांनी पेरणी केली, तर दुबार पेरणीची वेळ येणार नाही. नेहमीच्या पद्धतीने पेरणी केली, तर पावसाच्या अभावामुळे पेरण्या वाया जातील. दुबार पेरणीची वेळ येईल”, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांना केले आहे.
एल निनो म्हणजे काय?
अल निनो ही मध्य आणि पूर्व प्रशांत महासागरातील पाण्याचे तापमान वेळोवेळी वाढण्याची एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया सामान्यतः भारतातील मान्सून कमकुवत करण्याशी संबंधित आहे. कारण अल निनो सक्रिय झाल्यानंतर भारतात पाऊस कमी पडतो. जागतिक हवामान संघटनेने यासंदर्भात आधीच इशारा दिला आहे.
ही एक अशी भौगोलिक स्थिती आहे, ज्यामध्ये प्रशांत महासागराच्या मध्य व पूर्व भागातील पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा कमालीचे वाढते. दर दोन ते सात वर्षांच्या अंतराने घडणाऱ्या या प्रक्रियेमुळे समुद्रावरील हवा तापून वरच्या दिशेने प्रवाहित होते, ज्यामुळे पावसाच्या नैसर्गिक वितरणात मोठा व्यत्यय येतो. संशोधकांच्या मते, यंदा उद्भवलेली ही स्थिती वर्ष १९५० नंतरची सर्वात घातक आणि शक्तिशाली ठरण्याची दाट शक्यता आहे.
२०२६ च्या मध्यापासून अल निनोची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे आणि त्याचा परिणाम जगभरातील हवामान पद्धतींवर होईल असे म्हटले गेले आहे. एल निनो ही प्रशांत महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सामान्य स्थितीपेक्षा जास्त असण्याशी संबंधित एक हवामानविषयक घटना आहे, जी भारतासह अनेक देशांतील पावसावर परिणाम करू शकते.
दरम्यान, एल निनोचा सर्वाधिक परिणाम हा मॉन्सूनवर होतो. एल निनोमुळे सरासरीपेक्षा मॉन्सून कमी होऊ शकतो. राज्यातही मॉन्सून अद्याप दाखल झाला नाही. शेतकरी पेरणीकरिता मॉन्सूनची वाट पाहत आहेत. यातच एल निनो प्रशांत महासागरात सक्रिय झाल्याने त्याचा परिणाम देशातील मॉन्सूनवर होऊ शकतो.










