- जाहिरात -spot_img
breaking news

जान्हवी कपूरच्या बोल्ड सीन्सवर कंगना रनौतचे परखड वक्तव्य

मुंबई / नगर सह्याद्री –
साऊथ सुपरस्टार राम चरण आणि बॉलिवूडची अभिनेत्री जान्हवी कपूर अभिनीत ‘पेड्डी’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. तरीही हा चित्रपट एका नव्या वादामुळेही चर्चेत आला आहे. चित्रपटातील जान्हवी कपूरच्या व्यक्तिरेखेचे चित्रण आणि तिचे काही शोट्समुळे तिला ऑब्जेक्टिफिकेशन केल्याचा आरोप सोशल मीडियावर करण्यात आला आहे. या वादावर आता अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

‘पेड्डी’ प्रदर्शित झाल्यानंतर अनेक प्रेक्षकांनी जान्हवीच्या पात्राबाबत नाराजी व्यक्त केली. काही दृश्यांमध्ये तिच्या व्यक्तिरेखेपेक्षा तिच्या शारीरिक सौंदर्यावर अधिक भर दिल्याचा आरोप करण्यात आला. यामुळे सोशल मीडियावर अनेक नेटकऱ्यानी मोठी नाराजी व्यक्त केली. या सुरु असल्याल्या वादाबाबत एका मुलाखतीत कंगना रणौत यांना विचारले असता त्या म्हणाल्या, चित्रपट निर्माते मुद्दाम एखाद्या अभिनेत्रीला केवळ एक ‘वस्तू’ म्हणून सादर करण्याचा प्रयत्न करत नाहीत. मात्र, पुरुषांच्या दृष्टिकोनातून लिहिलेल्या पटकथांमध्ये कधीकधी असे काही प्रसंग असतात ज्यामुळे स्त्रियांना चुकीचं वाटू शकत. अशावेळी एक अभनेत्री म्हणून, तुम्ही तुमचे म्हणणे मांडले पाहिजे. जर एखादा सीन किंवा त्याची सुरुवात तुम्हाला योग्य वाटत नसेल, तर तुम्ही त्याबद्दल मोकळेपणाने बोलले पाहिजे.

बहुतेक वेळा, लोक तुमचा दृष्टिकोन समजून घेतात आणि त्यात बदल करण्यास तयार होतात.”. या चित्रपटाभोवती वाढत्या टीकेनंतर ‘पेड्डी’चे दिग्दर्शक बुच्ची बाबू सना यांनीही प्रतिक्रिया देत प्रेक्षकांच्या भावना लक्षात घेऊन काही बदल करण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले आहे. महिलांचा सन्मान राखणे महत्त्वाचे असल्याचे सांगत त्यांनी वादग्रस्त वाटणाऱ्या बाबींचा फेरविचार करण्याचे आश्वासन दिले. दरम्यान लवकरच कंगना रणौत यांचा ‘भारत भाग्य विधाता’ हा चित्रपट लवकरत प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट २६/११ च्या हल्यावेळी कामा हॉस्पिटलमधील धडसी निर्भिड नर्सवर आधारित आहे. यावेळी त्यांनी केलेले कार्य उत्तम प्रकारे मांडण्यात आले आहे. कंगना यांच्यासह या चित्रपटात गिरिजा ओक गोडबोले, स्मिता तांबे, ईशा डे, प्रसाद ओक, आशा शेलार असे मराठी कलाकार देखील आहेत. हा चित्रपट १२ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.

हे सुद्धा वाचा :  अभिनेत्री नव्हे, तर क्रिमिनल सायकॉलॉजिस्ट बनायचं होतं : त्रिशा कृष्णन
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ