- जाहिरात -spot_img
breaking news

डिजिटल पद्धतीने होणार जनगणना – २०२७ ; प्रक्रिया होणार दोन टप्प्यांत पूर्ण

जिल्ह्यात ३० चार्ज अधिकारी व हजारो प्रगणकांची नियुक्ती
अहिल्यानगर | नगर सह्याद्री

भारतातील जनगणना ही जगातील सर्वात मोठ्या सांख्यिकीय उपक्रमांपैकी एक मानली जाते. १८७२ पासून सुरू झालेली ही परंपरा २०११ पर्यंत अखंडपणे पार पडली असून कोविड-१९ मुळे पुढे ढकलण्यात आलेली जनगणना-२०२७ आता नव्या डिजिटल स्वरूपात राबविण्यात येत आहे. २०२७ ची ही जनगणना १८७२ नंतरच्या मालिकेतील १६ वी व स्वातंत्र्यानंतरची ८ वी जनगणना असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

जनगणना-२०२७ ही दोन टप्प्यांत पूर्ण केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात घरांची यादी व घरगणना करण्यात येणार असून हा टप्पा १ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत पार पडणार आहे. यामध्ये १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत स्वयंगणना सुविधा उपलब्ध राहणार आहे, तर १६ मे ते १४ जून २०२६ दरम्यान प्रगणकांकडून प्रत्यक्ष क्षेत्रीय सर्वेक्षण केले जाणार आहे. दुसर्‍या टप्प्यात लोकसंख्या गणना २०२७ मध्ये पार पडणार आहे.
जिल्ह्यात जनगणना – २०२७ साठी मोठ्या प्रमाणावर यंत्रणा कार्यरत करण्यात आली असून एकूण ३० चार्ज अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. याशिवाय सुमारे ६,८६९ प्रगणक व १,१४५ पर्यवेक्षक अशा एकूण ८,०१४ कर्मचार्‍यांची, तसेच याव्यतिरिक्त १० टक्के अतिरिक्त मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्वांना दि. २३ एप्रिल ते ८ मे २०२६ या कालावधीत प्रशिक्षण दिले जात आहे. या जनगणनेचे वैशिष्ट्य म्हणजे प्रथमच डिजिटल माध्यमातून माहिती संकलन करण्यात येणार आहे. नागरिकांना  स्वयंगणना करण्यासाठी हीींिीं://ीश.लशर्पीीी.र्सेीं.ळप या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून ती १ मे ते १५ मे या कालावधीत खुली राहणार आहे. या पोर्टलवर इंग्रजी, हिंदीसह इतर १४ भाषांमध्ये माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. क्षेत्रीय स्तरावर घरगणना करताना प्रगणकांकडून नागरिकांना सुमारे ३३ प्रकारचे प्रश्न विचारले जाणार असून त्यामध्ये घरांची संख्या, घरांचा प्रकार, कुटुंबाची माहिती तसेच सामाजिक व आर्थिक बाबींचा समावेश असेल. जनगणना-२०२७ ही राष्ट्रीय स्तरावरील अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असून अचूक व विश्वासार्ह माहिती देणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. डिजिटल माध्यमाचा अधिकाधिक वापर करून स्वयंगणना प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहनही प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा :  ...तर दोन महिन्यांपूवच आमदार झालो असतो; डॉ. सुजय विखे पाटील काय म्हणाले पहा...

जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांची प्रशिक्षण सत्रास भेट
जनगणना – २०२७ च्या निमित्ताने प्रत्येक तालुकास्तरावर प्रगणकांसाठी प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. प्रगणकांना तज्ज्ञांमार्फत प्रशिक्षण देण्यात येत असून या प्रशिक्षणास जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया हे स्वतः भेट देऊन प्रशिक्षणाची माहिती घेत आहेत. जनगणना ही देशाच्या नियोजन प्रक्रियेसाठी अत्यंत महत्त्वाची व मूलभूत माहिती देणारी प्रक्रिया असल्याने प्रत्येक प्रगणकाने स्वतःवर सोपवलेली जबाबदारी अत्यंत अचूकपणे व प्रामाणिकपणे पार पाडावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिल्या आहेत.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ