- जाहिरात -spot_img
breaking news

श्रीगोंदा, बेलवंडीतील 35 आरोपींची नाशिकला रवानगी

श्रीगोंदा | नगर सह्याद्री
श्रीगोंदा व बेलवंडी पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील खून, दरोडा, गंभीर दुखापत, चोरी, फसवणूक आणि मारामारीसारख्या विविध गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी  सुनावल्यानंतर त्यांची नाशिक मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली.

बुधवार (दि. 8 जुलै) रोजी श्रीगोंदा येथील दुय्यम कारागृहात ठेवण्यात आलेल्या 35 आरोपींना शासनाच्या नियमानुसार व दुय्यम कारागृहाचे अधीक्षक यांच्या आदेशानुसार कडेकोट पोलीस बंदोबस्तात नाशिक मध्यवत कारागृहात हलविण्यात आले.ही कारवाई जिल्हाधिकारी पंकज आशिया व पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका यांच्या आदेशानुसार करण्यात आली. तहसीलदार तथा दुय्यम कारागृह अधीक्षक सचिन डोंगरे आणि श्रीगोंदा पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली राखीव पोलीस निरीक्षक उमेश परदेशी, पोलीस निरीक्षक प्रदीप माने, श्रीगोंदा व बेलवंडी पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदार तसेच जेलर बाबुराव कारखिले यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.या कारवाईमुळे दुय्यम कारागृहातील न्यायालयीन कोठडीतील आरोपींचे नियमानुसार स्थलांतर करण्यात आले असून संपूर्ण प्रक्रिया कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत पार पडल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हे सुद्धा वाचा :  पाणीपुरवठा विस्कळित; नागरिक संतप्, कारवाईची मागणी
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ