- जाहिरात -spot_img
breaking news

जूनपासून विमान कंपन्यांचा मोठा निर्णय; महत्वाचे कारण आले समोर…

नवी दिल्ली / वृत्तसंस्था –
जर तुम्ही फिरण्याकरिता विमान तिकिट बुक करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्याकरिता अत्यंत महत्वाची आहे. जर तुम्ही देशामध्येच विमान प्रवास करण्याचा विचार करत असाल तर आजच तात्काळ तुमचे विमान तिकिट बुक करा. नाही तर तुम्हाला मोठा फटका बसू शकतो. भारतातील दोन सर्वात मोठ्या विमान कंपन्या अर्थात इंडिगो आणि एअर इंडिया 1 जून 2026 पासून मोठा निर्णय घेत आहेत. 1 जूनपासून पुढे तीन महिन्यांकरिता त्यांच्या देशांतर्गत विमानसेवा मोठ्या प्रमाणात कमी करत आहेत. विमानांमध्ये कपात करत आहेत. देशांतर्गत मार्गांवरील विमानांची संख्या कमी केल्याने आता विमान तिकिटात मोठी वाढ होऊ शकते. इंधनाच्या किमती वाढल्यामुळे विमान कंपन्यांनी आधीच तिकिटांचे दर वाढवले ​​आहेत. त्यामध्येच आता विमानांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला.

एअर इंडिया आपल्या देशांतर्गत विमानसेवांमध्ये अंदाजे 15 टक्के कपात करण्याचा निर्णय घेत आहे. देशातील सर्वात मोठी विमान कंपनी असलेल्या इंडिगोकडूनही आपल्या देशांतर्गत सेवेत 7 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला. शाळेला सुट्ट्या लागल्या असून पालक मुलांसह बाहेर फिरण्याकरिता जात असतानाच हा निर्णय विमान कंपन्यांकडून घेण्यात आला.

उड्डाणे कमी करण्याचा हा कल आधीच सुरू झाला आहे. भारतातील चार सर्वात मोठ्या विमान कंपन्यांनी मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी मार्च आणि एप्रिलमध्ये अंदाजे 6 टक्के कमी उड्डाणे केली. इंडिगोने आपल्या उड्डाणांमध्ये4.5 टक्के आणि एअर इंडियाने 7.5 टक्के कपात केली. एअर इंडिया एक्सप्रेसने याच कालावधीत 17 कमी उड्डाणे केली. एका मागून एक कंपन्या याबाबत निर्णय घेत आहेत. इंधन दरवाढ आणि इंधनाचा तुटवडा यादरम्यानच विमान कंपन्यांकडून हे निर्णय घेतली जात आहेत.

इराण आणि अमेरिका युद्धाचा फटका विमान कंपन्यांना बसत आहे. विमानांमध्ये मोठ्या प्रमाणात कपात करून जे विमान सुरू आहेत, त्याच्या तिकिटाच्या किमतीमध्ये वाढ होणार. यापूर्वी अनेक विमान कंपन्यांनी काही देशातील आपली विमानसेवा कमी करण्याचाही निर्णय घेतला. इराण आणि अमेरिका युद्ध अजून काही दिवस चालले तर त्याचे गंभीर परिणाम भारतात अजून बघायला मिळू शकतात.

हे सुद्धा वाचा :  राज्यसभा गाजवली, देशभर चर्चा, पण तरीही आपची राघव चड्डांवर कारवाई; नेमकं कारण काय?
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ