- जाहिरात -spot_img
breaking news

कुकडीतून विसापूर धरणात पाणी सोडण्याचा निर्णय

आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश

श्रीगोंदा | नगर सह्याद्री
कुकडी प्रकल्पाच्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे धरणांतील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. विशेषतः येडगाव धरणातील पाणीसाठा 75 टक्क्यांहून अधिक झाल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले. कुकडी प्रकल्पातून विसापूर धरणात अतिरिक्त पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे विसापूर कालवा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना खरीप हंगामाबरोबरच आगामी रब्बी हंगामासाठीही मोठा दिलासा मिळणार आहे.

धरणांमध्ये वाढलेल्या पाणीसाठ्याची माहिती मिळताच आमदार पाचपुते यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी तातडीने संपर्क साधून विसापूर धरणातील उपलब्ध पाणीसाठा, लाभक्षेत्रातील शेतीची गरज आणि शेतकऱ्यांची परिस्थिती याकडे लक्ष वेधले. कुकडी प्रकल्पातून विसापूर धरणात त्वरित पाणी सोडण्याची मागणी त्यांनी केली. या मागणीची दखल घेत प्रशासनाने पाणी सोडण्यास मंजुरी दिली.

या निर्णयामुळे श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर कालवा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी आवश्यक पाणी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. खरीप पिकांना तसेच पुढील रब्बी हंगामाच्या नियोजनालाही या निर्णयाचा मोठा फायदा होणार असल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत असून आमदार विक्रमसिंह पाचपुते आणि महायुती सरकारचे आभार मानले जात आहेत.

हे सुद्धा वाचा :  गद्दार दिसला की ऑपरेशन तुडवा सुरू करा; संजय राऊत यांनी शिवसैनिकांना दिला आदेश
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ