- जाहिरात -spot_img
breaking news

राजकारणातील सर्वात मोठी बातमी, विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध, काय घडलं पहा

मुंबई / नगर सह्याद्री :
महाराष्ट्रात होत असलेली विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार हे आता निश्चित झाले आहे. उद्धव ठाकरेंनी अंबादास दानवेंना उमेदवारी दिल्यामुळे काँग्रेसकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. काँग्रेसने उमेदवार देण्याबाबत चर्चा सुरू केली होती. पण ठाकरेंच्या शिष्टमंडळाने काँग्रेस नेत्यांची भेट घेत समजूत काढली. अखेर काँग्रेसकडून विधान परिषद निवडणूक न लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि ठाकरेसेनेचे अनिल देसाई यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. यामध्ये हर्षवर्धन सपकाळ यांनी ठाकरेंनी दिलेल्या उमेदवाराला पाठिंबा असल्याचे जाहीर केले.

काँग्रेस विधान परिषदेसाठी अर्ज भरणार नाही. मविआचे उमेदवार अंबादास दानवेच असतील, अशी घोषणा हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. मविआ म्हणून आम्ही भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षासोबत एकत्र लढा देणार आहे. लोकसभा निवडणुकीला मविआला चांगले यश मिळाले होते. यापुढेही आम्ही एकत्रच लढा देऊ. आमच्यामध्ये कोणतीही नाराजी नाही, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे यांनी घेतलेला निर्णय मविआचा निर्णय म्हणून आम्ही समर्थन करत आहोत. अंबादास दानवे यांना आमचा पाठिंबा असेल. आम्ही भाजपच्याच विरोधात आहोतच, त्याशिवाय महायुतीमधील घटकपक्ष शिंदेसेना, राष्ट्रवादीविरोधात आम्ही विरोधात काय राहू. भाजप हा आमचा प्रमुख विरोधक आहे, त्यांच्यासोबतचा संघर्ष कायम राहणार आहे.
हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

उद्धव ठाकरे यांचा निर्णय हा मविआचा निर्णय आहे. उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज भरावा, अशी आमची भूमिका होती. पण त्यांनी माघार घेत दानवेंना उमेदवारी दिली. हा निर्णय आम्हाला मान्य आहे, आमचा अंबादास दानवे यांना पाठिंबा असेल. आमच्याकडून कुठालाही दुसरा अर्ज भरला जाणार नाही. मविआ म्हणून आम्ही एकत्र आहोत, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. दरम्यान, १२ मे २०२६ रोजी विधान परिषदेसाठी मतदान होणार आहे, त्याच दिवशी सायंकाळी मतमोजणी होणार आहे. उमेजदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. सर्व पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

हे सुद्धा वाचा :  राज्याला उन्हाचा चटका, तापमान ४० शी पार; मान्सूनची स्थिती काय? हवामानाचा अंदाज

भाजपचे विधान परिषदेचे उमेदवार कोणते?
प्रज्ञा सातव
प्रमोद जठार
संजय भेंडे
माधवी नाईक
विवेक कोल्हे
सुनिल कर्जतकर

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार
बच्चू कडू
निलम गोऱ्हे

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)
झिशान सिद्दीकी

शिवसेना ठाकरे गट
अंबादास दानवे

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ