- जाहिरात -spot_img
breaking news

राहुरी पाणीपुरवठा योजनांचा प्रश्न विधिमंडळात गाजला!; काय घडलं पहा..

आमदार प्राजक्त तनपुरेंची लक्षवेधी
राहुरी | नगर सह्याद्री
राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर, कुरणवाडी, मिरी, तिसगाव, मुसळवाडी, बुऱ्हाणनगरसह अनेक प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची दुरवस्था आणि त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी निधीची कमतरता हा गंभीर प्रश्न आमदार प्राजक्त तनपुरे यांनी लक्षवेधीद्वारे विधीमंडळात मांडला.

राज्यातील बहुतांश प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आर्थिक अडचणीत सापडल्याने त्यांच्या नियमित देखभाल व संचालनावर विपरीत परिणाम होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. तसेच शासनाने याबाबत तातडीने धोरणात्मक निर्णय घेण्याची मागणी केली. आ. तनपुरे म्हणाले की, राहुरी मतदारसंघातील अनेक योजना जीर्णावस्थेत असून, पूव वीजबिलावर मिळणारा 50 टक्के परतावा बंद झाल्याने परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे संबंधित राज्यमंत्री मेघना साकोरे-बोडकर यांनी शासनाने हा प्रश्न गांभीर्याने घेतल्याचे स्पष्ट केले. राज्य शासनाने ‌’ऑपरेशन अँड मेंटेनन्स-2026‌’ हे नवीन धोरण तयार केले असून, त्याअंतर्गत प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या देखभाल, दुरुस्ती आणि नियमित संचालनासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे मंत्र्यांनी सभागृहात सांगितले.

हे सुद्धा वाचा :  शाळा, महाविद्यालय परिसरात टवाळखोरी....श्रीगोंदा पोलिसांची कारवाई
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ