- जाहिरात -spot_img

महाराष्ट्रात पुन्हा मोठा भूकंप? शरद पवारांची राष्ट्रवादी NDA सोबत जाणार

मुंबई / नगर सह्याद्री :
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून पुन्हा एकदा एक मोठी खळबळजनक बातमी समोर येत आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना बसलेल्या धक्क्यांनंतर, आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चांना उधाण आलं आहे. शरद पवार यांच्या पक्षाने आगामी काळात भाजपच्या नेतृत्वाखालील ‘एनडीए’ सोबत जावे का? यावर पक्षांतर्गत चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ नेत्यावर या संपूर्ण प्रक्रियेची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या नेत्याची भाजपच्या एका वरिष्ठ नेत्यासोबत महत्त्वाची बैठक झाल्याचे वृत्त आहे. या गुप्त बैठकीत दोन्ही बाजूंकडून प्राथमिक चाचपणी करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

८ खासदार अन् १० आमदारांची चाचपणी
सध्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडे ८ लोकसभा खासदार आणि १० आमदार आहेत. या सर्व लोकप्रतिनिधींच्या मनात नेमके काय सुरू आहे, त्यांची नेमकी भूमिका काय आहे, याची चाचपणी करण्याची जबाबदारी पक्षातीलच एका अत्यंत वजनदार आणि मोठ्या नेत्याकडे देण्यात आली आहे. पक्षातील लोकप्रतिनिधींमध्ये सध्यातरी या मुद्द्यावर दोन वेगवेगळे मतप्रवाह असल्याचे बोलले जात आहे.

थेट पाठिंबा की बाहेरून मदत? दोन पर्यायांवर चर्चा
भाजपसोबत जाण्याचा निर्णय झाल्यास एनडीएला नेमकी कशी मदत करायची, यावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. एनडीए आघाडीत अधिकृतपणे सामील होऊन सरकारमध्ये थेट सहभागी होणे. आघाडीत थेट न जाता किंवा सरकारमध्ये न बसता बाहेरून सरकारला अनुकूल भूमिका घेणे किंवा मदत करणे. या दोन तदाव्यावर चर्चा सुरू असल्याचे सूत्रांनी सांगतले.

काही दिवसांपूर्वीच महाविकास आघाडीला बसलेल्या राजकीय धक्क्यांनंतर आता शरद पवारांच्या या संभाव्य भूमिकेमुळे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणाला कोणती नवी कलाटणी मिळते, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे डोळे लागले आहेत. अद्याप यावर पक्षाकडून कोणतीही अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही.

हे सुद्धा वाचा :  युवाशक्तीच्या बळावर भाजप अधिक सक्षम करू ; महाडिक
Follow us:

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Follow us on

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ

आमच्याविषयी

राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला. सामाजिक स्वास्थ्य अबाधित ठेवणारी पत्रकारीता करीत असताना रोखठोक आणि आक्रमक पत्रकारीता ही ‘नगर सह्याद्री’ची ओळख! ‘नगर सह्याद्री’ वाचला जातो तो वेगळ्या वैचारिक लिखाणासाठी! आम्ही परखड विचारांचा ‘सारिपाट’ मांडतो त्यासाठीच! लाळघोटणारी पत्रकारीता ‘नगर सह्याद्री’च्या टीमने कधी केली नाही आणि करणार पण नाही!

अहिल्यानगर कार्यालय

कुंदन नगरी अपार्टमेंट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, माळीवाडा अहमदनगर महाराष्ट्र ४१४००१

© 2026 Nagarsahyadri.com