- जाहिरात -spot_img
breaking news

भीषण अपघात, बाप-लेकीचा मृत्यू, महिलेच्या डोळ्यासमोर नवरा अन् मुलीनं प्राण सोडले

यवतमाळ / नगर सह्याद्री –
यवतमाळमध्ये पांढरकवडा घाटंजी मार्गावरील साखराजवळ मध्यरात्री भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये बाप-लेकीचा जागेवरच मृत्यू झाला. तर महिला गंभीर जखमी झाली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करून चारचाकीने आदिलाबादकडे निघाले होते. त्याच वेळी अचानक काळाने घाला घातला. साखराजवळ चारचाकी आणि ट्रकची जोरदार धडक झाली. या दुर्दैवी घटनेत सहा महिन्यांची चिमुकली आणि बापाचा जागीच मृत्यू झाला. साईकिरण गुरगुल्ला आणि हंसिका गुरगुल्ला यांचा या अपघातात मृत्यू झाला.

यवतमाळच्या पांढरकवडा घाटंजी मार्गावरील साखरा गावालगत रात्री दरम्यान भीषण अपघात झाला. यात गुरगुल्ला कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. ट्रक आणि चारचाकी वाहनाच्या अपघातात बाप आणि सहा महिन्यांच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला. तर आई गंभीर जखमी झाली आहे. महिलेला उपचारासाठी खासगी रूग्णलायात दाखल कऱण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, सणाच्या दिवशीच घडलेल्या या दुर्दैवी अपघाताने सर्वत्र शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पांढरकवडा येथून घाटंजीकडे जाणाऱ्या ट्रकची आणि साखरा गावाकडून येणाऱ्या चारचाकी स्विफ्ट डिझायर वाहनाची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात चारचाकी वाहन पूर्णपणे चकनाचूर झाले. या दुर्घटनेत साईकिरण गुरगुल्ला 32 वर्ष आणि त्यांची सहा महिन्यांची मुलगी हंसिका साईकिरण गुरगुल्ला यांचा जागीच मृत्यू झाला. तर अनुष्का साईकिरण गुरगुल्ला या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना तातडीने यवतमाळ येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

गुरगुल्ला कुटुंब साखरा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी आले होते. कार्यक्रम आटोपून ते परत आदिलाबादकडे चारचाकी वाहनाने जात असताना नियतीने हा त केला. अपघाताची माहिती मिळताच घाटंजी येथील ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर निखिल पुंडे, समाजसेवक मुज्जू पटेल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. त्यांनी जखमी महिलेला तात्काळ रूग्णालयात दाखल केले.

हे सुद्धा वाचा :  अखेर मान्सून दाखल, 'या' तारखेपर्यंत पेरणी करूच नका; काय आहे हवामान विभागाचा सल्ला
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ