मुंबई / नगर सह्याद्री –
गेल्या काही दिवसांमध्ये पावसाने थैमान घातले. पूर्ण जून महिन्यात जेवढा पाऊस पडतो, तेवढा 6 दिवसांमध्येच कोसळला. अनेक भागात पाणी साचले. दरड कोसळल्या. काही भागात 5 दिवस पूर्ण होऊनही पाणी अजूनही साचलेले आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. ज्याचा लोकल सेवेवर थेट परिणाम झाला. राज्यात पावसाने 1 जुलैपासून धुमाकूळ घातला. आज कुठे पाऊस उघडला आहे. सूर्याचे दर्शनही होत नव्हते. यंदा 2 जून रोजी केरळमध्ये मॉन्सून दाखल झाला. त्यानंतर तब्बल काही दिवस हा मॉन्सून अरबी समुद्रातच रेंगाळत होता. जून महिना संपत आला तरीही मॉन्सूनचा पाऊस राज्यात दाखल झाला नव्हता. शेवटी जोरदार पावसाला सुरूवात झाली. 1 जुलैपासून राज्यात धुव्वाधार पाऊस झाला. आजही अनेक भागात भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला.
अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. काल पुण्यातील काही भागात पाऊस झाला. मुंबईतही रात्री पाऊस सुरू होता. अखेर सकाळी मुंबईत पावसाने विश्रांती घेतली. कोकणात पावसाचा जोर कमी झाला. सातारा आणि पुणे घाटमाथा परिसरात अतिमुसळधार पावसाचा आज अंदाज वर्तवण्यात आला. कोकणात पावसाचा आज येलो अलर्ट जारी करण्यात आला.
मॉन्सून संपूर्ण देशात दाखल झाला असून पोषक वातावरण मिळत आहे. गुजरात आणि केरळच्या किनाऱ्या लगत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, जळगाव, धुळे, नाशिक घाटमाथा या भागात आज पाऊस हजेरी लावेल. विदर्भ आणि मराठवाड्यात काही भागात विजांसह पाऊस होण्याचा अंदाज आहे.
मुसळधार पावसामुळे उल्हास नदीला पूर, मोहने जलशुद्धीकरण केंद्रातील पंपांमध्ये गाळ साचला. नदीच्या तीव्र प्रवाहात केडीएमसीची मुख्य जलवाहिनी फुटल्याने शहराचा पाणीपुरवठा 48 तासांपासून ठप्प. कल्याण-डोंबिवलीच्या पूर्व-पश्चिम भागातील हजारो कुटुंबांना तीव्र पाणीटंचाईचा फटका. बेतुरकर पाड्यात महिला बादल्या, टब आणि ड्रममध्ये पावसाचे पाणी साठवून गरज भागवत आहेत. काही नागरिक पावसाचे पाणी गाळून व उकळून पिण्यासाठी वापरण्याची वेळ आली. पावसाने ठाणे जिल्ह्यातही जोरदार हजेरी लावली.










