- जाहिरात -spot_img
breaking news

जामखेड शेतकरी भवनासाठी ३२ लाखांचा पहिला हप्ता वितरित; सभापती प्रा.राम शिंदे यांचा पाठपुरावा

 

​अहिल्यानगर / नगर सह्याद्री :
जामखेड येथील छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन’ उभारण्यासाठी शासनाने ३१ लाख ९६ हजार ५ रुपयांचा पहिला हप्ता वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे पणनमंत्री जयकुमार रावल यांनी या महत्त्वपूर्ण कामासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे.या महत्वपूर्ण निर्णयामुळे शेतीमाल विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुक्कामाचा व मूलभूत सुविधांचा प्रश्न एकाच ठिकाणी सुटणार आहे.

​शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाकडून २७ मार्च २०२६ रोजी यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला. नवीन शेतकरी भवन बांधकामासाठी प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर निविदा प्रक्रिया राबवून १ कोटी २७ लाख ८४ हजार १७ रुपयांची निविदा मंजूर करण्यात आली होती. या मंजूर रकमेच्या ५० टक्के प्रमाणे ६३ लाख ९२ हजार ९ रुपये इतके शासन अनुदान या बांधकामासाठी अनुज्ञेय ठरले आहे. या अनुज्ञेय अनुदानाच्या ५० टक्के रक्कम म्हणजेच ३१ लाख ९६ हजार ५ रुपये पहिला टप्पा म्हणून वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. हा उपलब्ध झालेला निधी वितरीत करण्यासाठी पुणे येथील राज्याच्या पणन संचालकांना मान्यता देण्यात आली आहे.

​मंजूर करण्यात आलेला पहिल्या टप्प्यातील हा निधी जामखेड येथील छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आधार संलग्नित बँक खात्यावर पणन संचालनालयामार्फत थेट जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे या भवनाच्या प्रत्यक्ष बांधकामाला आता गती मिळणार आहे. राज्यातील ज्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकरी भवन उपलब्ध नाही, तेथे नवीन भवन बांधणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे जामखेडमधील हा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला असून परिसरातील हजारो शेतकरी बांधवांना यातून मोठा दिलासा मिळणार आहे.

हे सुद्धा वाचा :  पुणे दारू दुर्घटनेनंतर नगर पोलीस ऍक्शन मोडमध्ये; कंपनीचे सर्व्हर हॅक करून ३७ लाखांची, व्यापाऱ्याची अन नोकरीच्या आमिषाने वृद्धाची फसवणूक
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ