प्रसिद्ध रिलस्टार रोहिणी पाराध्ये यांची आत्महत्या / हॉटेलच्या किचनमध्ये गळफास घेऊन संपवलं आयुष्य / कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आली समोर
सोलापूर / नगर सह्याद्री –
सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालु्क्यातील प्रसिद्ध रिलस्टार आणि हॉटेल ग्रामपंचायतच्या मालकीण रोहिणी पाराध्ये यांच्या मृत्यूमुळे सर्वांना मोठा धक्का बसला. २५ वर्षांच्या रोहिणी पाराध्ये यांचा मृतदेह हॉटेलमध्ये आढळून आला होता. या प्रकरणाच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. रोहिणी यांनी कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती तपासातून समोर आली आहे. मंगळवारी हॉटेलम ग्रामपंचायतच्या स्वयंपाकघरात त्यांनी गळफास घेत आत्महत्या केली.
रिलस्टार रोहिणी पाराध्ये यांनी कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यांनी प्रेम विवाह केला होता. काही काळ ते पुणे येथे राहत होते. तिथेच त्यांनी रिल करायला सुरुवात केली होती. मंगळवेढा तालुक्यात ब्रम्हपुरी येथील हॉटेल ग्रामपंचायतीच्या त्या मालकीन होत्या. रोहिणी निलेश पाराध्ये यांनी मंगळवारी हॉटेलच्या स्वयंपाकघरातील लोखंडी अँग्लला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. रिलस्टार विवाहित रोहिणी यांच्या आत्महत्येने सोलापूर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. अज्ञात कारणावरून आत्महत्या केली असल्याचे सांगितले जात असले तरी त्यांनी कौटुंबिक वादातून आत्महत्या केली असावी अशी प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
या घटनेनंतर रोहिणी यांचा नवरा निलेश पराध्ये यांनी मंगळवेढा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानूसार पोलिसांनी आस्कमीत मृत्यू अशी नोंद केली असली तरी त्यांच्या आत्महत्येचे गूढ कायम आहे. गेल्या काही वर्षभरापासून रोहिणी पाराध्ये आणि निलेश पाराध्ये हे नवरा-बायको विविध सामाजिक घटना आणि खाद्यपदार्थावर आधारीत रिलच्या माध्यमातून सोशल मीडियावर लोकप्रिय झाले होते. त्यांच्या या लोकप्रियतेचा फायदा घेऊन त्यांनी रत्नागिरी-नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर खवैय्यासाठी ब्रह्मपुरी येथे हॉटेल ग्रामपंचायत हा व्यवसाय सुरू केला.
हॉटेल व्यवसायात ते स्थिर होऊन आणखी नवीन शाखा सुरू करत असताना अचानक पत्नी रोहिणी पाराध्ये यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिस सध्या त्यांच्या आत्महत्येमागचे खरे कारण शोधत आहेत. तरी देखील हॉटेल व्यवसायाच्या शाखा वाढल्या. यातून आलेल्या तणावामुळे आणि वादामुळे रोहिणीयांनी रागाच्या भरात आत्महत्या केली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे.










