- जाहिरात -spot_img
breaking news

NEET फेर परीक्षेआधी सरकारने घेतला मोठा निर्णय, पहा सविस्तर..

नवी दिल्ली / वृत्तसंस्था –
NEET-UG 2026 फेर परीक्षेआधी सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. Telegram बंदी घातली आहे. NEET-UG 2026 फेर परीक्षा 21 जून रोजी होणार आहे. टेलीग्रामवर 22 जून पर्यंत बंदी असेल. मेसेज एडिट फीचर 30 जून पर्यंत बंद राहील. NEET-UG 2026 फेर परीक्षा सुरक्षित आणि निष्पक्षतेने व्हावी म्हणून केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. NTA नुसार, काही टोळ्या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबांना प्रश्नपत्रिका उपलब्ध करुन देतो, असं सांगून फसवणूक करत होत्या. “Paper Leaked NEET”, “Re-NEET 2026” आणि “Private Mafia” सारख्या चॅनल्सवरुन हजारो ते लाखो रुपयांची मागणी केली जात होती. परीक्षेची प्रश्नपत्रिका पूर्णपणे सुरक्षित असून ती कोणाकडेही नाही, असं एजन्सीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

अनेक बाबतीत टेलिग्रामच्या मेसेज एडिट फिचरचा चुकीच्या पद्धतीने वापर करण्यात आला असं NTA कडून सांगण्यात आलं. परीक्षा झाल्यानंतर जुन्या मेसेजमध्ये खरी प्रश्नपत्रिका जोडून प्रश्नपत्रिका लीक झालीय असं दाखवण्यात येत होतं. असे खोटे प्रकार रोखण्यासाठी टेलिग्राम बंदीचं पाऊल उचलण्यात आलं आहे.

आम्हाला माहितीय Telegram चा वापर लाखो लोक शिक्षण, नोकरी आणि व्यक्तिगत कामांसाठी करतात. त्यामुळे त्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल आम्हाला खंत आहे असं NTA ने म्हटलं आहे. टेलिग्रामवरील बंदी ठराविक काळासाठी आहे. 21 जूनला होणारी NEET-UG 2026 सुरक्षित पार पाडावी यासाठी ही बंदी घातली आहे.

किती लाख मुलं परीक्षेला बसणार?
एजन्सीने विद्यार्थी आणि पालकांना आवाहन केलय की, कुठलीही अफवा आणि चुकीच्या माहितीवर विश्वास ठेऊ नका. परीक्षेशी संबंधित कुठलीही माहिती अधिकृत वेबसाइट neet.nta.nic.in आणि NTA सोशल मिडिया अकाऊंटसवरुन घ्या. पेपर फुटल्यामुळे 3 मे रोजी NEET UG परीक्षा रद्द झाली. आता 21 जूनला फेर परीक्षा होणार आहे. 22 लाख विद्यार्थी नीटची फेर परीक्षा देणार आहेत. नीट ही देशातील लाखो विद्यार्थ्यांसाठी महत्वाची परीक्षा आहे. नीट परीक्षेचे पेपर फुटू नयेत यासाठी पेपर पोहोचवण्याची जबाबदारी वायू दलावर सोपवण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा :  एकनाथ शिंदेंची मोठी खेळी.! ‘हा’ मोठा पक्ष शिवसेनेत विलीन होणार? काय घडतंय पहा
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ