- जाहिरात -spot_img
breaking news

तिहेरी हत्याकांडाने सोलापूर हादरले, मध्यरात्री आई अन् दोन मुलांची तलवारीने वार करत हत्या

सोलापूर / नगर सह्याद्री –
सोलापूरमध्ये तिहेरी हत्याकांडाची घटना घडली. मध्यरात्री आई आणि दोन मुलांवर तलवारीने सपासप वार करण्यात आले. या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या तिघांचाही जागीच मृत्यू झाला. ही घटना सोलापूरच्या बोरामणी परिसरात घडली. महिलेच्या दिरानेच हे भयंकर कृत्य केलं. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिघांचे मृतदेह ताब्यात घेत तपास सुरू केला.

मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर शहरालगतच्या बोरामणी परिसरात घडलेल्या तिहेरी हत्याकांडाने संपूर्ण जिल्हा हादरला. संपत्तीच्या वादातून दिराने हे भयंकर कृत्य केले. त्याने भावाच्या बायको म्हणजे वहिनी, पुतणी आणि पुतण्याचा जीव घेतला. मध्यरात्री तिघांवर तलवारीने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला. गायत्री सुधाकर मस्के, मुलगी प्रिया मस्के आणि मुलगा शिवराज मस्के अशी हत्या झालेल्या तिघांची नावं आहेत. महिलेच्या नवऱ्याचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते.

गायत्री आपल्या दोन मुलांसह बोरामणी परिसरात राहत होती. नवऱ्याच्या निधनानंतर अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत कसाबसा त्या संसार करत होत्या. गायत्री यांचा दिर पप्पू शेजारीच राहत होता. मध्यरात्री तो स्वतःच्या घरातून वहिनीच्या घरात घुसला. त्याच्या हातामध्ये तलवार होती. गायत्री आणि त्यांचा दिर पप्पू यांच्या घरांना एकाच गच्चीवर जाण्याचा मार्ग आहे. गायत्री आणि त्यांची दोन्ही मुलं गच्चीवर झोपले होते. यावेळी संपत्तीच्या वादातून जोरदार हाणामारी सुरू झाली.

त्यानंतर आरोपीने हतातल्या तलवारीने आधी गायत्री यांच्यावर हल्ला केला. यावेळी त्यांची दोन्ही मुलं त्यांना वाचवण्यासाठी मध्य पडले. तर आरोपीने त्यांच्यावर देखील तलवारीने सपासप वार केले. तिघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले. या हल्ल्यात तिघांचाही मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सोलापूर तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तिघांचे मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले आणि संपूर्ण घर सील केले. आई आणि मुलांच्या हत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हे सुद्धा वाचा :  भारताला मोठा दिलासा! मुंबईत पोहचलं कच्च्या तेलाचे पहिले जहाज; पहा काय घडलं
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ