- जाहिरात -spot_img
breaking news

दुसऱ्या धर्माच्या मुलासोबत लग्न, प्रेमही करू शकणार नाही :अभिनेत्री रीम शेख

मुंबई / नगर सह्याद्री –
टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री रीम शेख सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यावरील वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये सहभागी होत तिने प्रेमसंबंध आणि लग्नाबाबत आपली स्पष्ट भूमिका मांडली. विशेषतः आंतरधर्मीय विवाहाविषयी बोलताना तिने थेट सांगितले की, ती वेगळ्या धर्माच्या व्यक्तीच्या प्रेमात पडणार नाही किंवा त्याच्याशी लग्न करणार नाही.

शार्दुल पंडितच्या पॉडकास्टमध्ये झालेल्या संवादात यावेळी तिला विचारण्यात आले की, कुटुंबात आंतरधर्मीय विवाह असूनही स्वतःच्या आयुष्यात असा निर्णय घेतल्यास अडचणी येतील का? यावर उत्तर देताना रीमने सांगितले की, हे प्रत्येकाच्या स्वभावावर अवलंबून असते; मात्र ती स्वतः अत्यंत धार्मिक वृत्तीची आहे.

ती म्हणाली की, “मी दिवसातून पाच वेळा नमाज अदा करते आणि माझ्या धार्मिक आचारांचे काटेकोर पालन करते. त्यामुळे माझ्या धर्माबाहेर लग्न करणे मला शक्य नाही.” तिच्या मते, ज्या व्यक्तीचा धर्म वेगळा आहे, त्याच्यासोबत आयुष्य घालवणे तिला अवघड जाईल. तसेच अशा निर्णयामुळे समाजातील टीकेलाही सामोरे जावे लागू शकते, असेही तिने स्पष्ट केले.

रीमने पुढे सांगितले की, रमजानमध्ये ती नियमित रोजे पाळते आणि आयुष्यातील कठीण प्रसंगी प्रार्थनेतूनच तिला आधार मिळतो. त्यामुळे तिच्या श्रद्धा आणि जीवनशैलीशी जुळणारा जोडीदार असणे तिच्यासाठी महत्त्वाचे आहे.

दरम्यान, तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलताना तिने तिच्या पालकांच्या घटस्फोटाचा उल्लेखही केला. तिच्या आई-वडिलांमध्ये सतत भांडणं होत असल्यामुळे बालपण कठीण गेल्याचं तिने सांगितलं. विशेष म्हणजे, तिच्या पालकांचे आंतरधर्मीय लग्न झाले होते आई हिंदू तर वडील मुस्लिम आणि त्यांच्या घरी दोन्ही धर्मांचे पालन होत असे.

कामाबद्दल बोलायचे झाले तर, रीम शेख गेल्या वर्षी ‘लाफ्टर शेफ्स’ या कार्यक्रमात दिसली होती. तिने एक वेब सिरीज आणि चार म्युझिक व्हिडिओ देखील प्रदर्शित केले. सध्या, रीमने तिच्या पुढील कामाबाबत अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही.

हे सुद्धा वाचा :  आता शर्वरीकडे चित्रपटांची रांग; संघर्षाची कहाणी ऐकून फराह खानही थक्क!
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ