- जाहिरात -spot_img
breaking news

सुप्यात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; पाच महिलांची सुटका, चौघांना अटक

दोन हॉटेलवर छापा; दोन मुख्य सूत्रधार फरार
सुपा / नगर सह्याद्री :
जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत सुपा पोलीस ठाणे हद्दीतील दोन हॉटेलवर छापे टाकून वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश करण्यात आला. या कारवाईत पाच महिलांची सुटका करण्यात आली असून चार जणांना अटक करण्यात आली आहे. तर दोन मुख्य सूत्रधार फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या पथकाने ही कारवाई केली. स्थानिक गुन्हे शाखा आणि सुपा पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने गुरुवारी (दि. १९) सुपा हद्दीतील पळवे शिवारातील ओम साई हॉटेल आणि राखी पॅलेस लॉजिंग येथे छापे टाकले.
पोलिसांनी प्रथम बनावट ग्राहक पाठवून संबंधित ठिकाणी वेश्याव्यवसाय सुरू असल्याची खात्री केली. त्यानंतर छापा टाकून ओम साई हॉटेलमधून सुनिल लक्ष्मण खोले (रा. नारायणगव्हाण, ता. पारनेर) व विनोद विलास मिडाळेकर (मूळ रा. बेळगाव, सध्या रा. ओम साई हॉटेल, पळवे) यांना ताब्यात घेतले. यावेळी दोन महिलांची सुटका करण्यात आली. या प्रकरणातील संग्राम कांडेकर हा मुख्य आरोपी फरार आहे.

त्यानंतर राखी पॅलेस लॉजिंगवर छापा टाकण्यात आला. यामध्ये दीपक सुनार आणि गोवर्धन ओमप्रकाश बुल या दोघांना ताब्यात घेण्यात आले. या ठिकाणाहून तीन महिलांची सुटका करण्यात आली. या प्रकरणातील वैभव साठे (रा. चास, ता. जि. अहिल्यानगर) हा आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

या कारवाईदरम्यान आरोपींकडून एकूण ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल, ज्यामध्ये तीन मोबाईल फोन व रोख रक्कमेचा समावेश आहे, जप्त करण्यात आला.
याप्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ९९ तसेच स्त्रिया व मुलींच्या अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा, १९५६ अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुपा पोलीस करीत आहेत.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीष भोये, पोलीस अंमलदार अतुल लोटके, विष्णू भागवत, गणेश लोंढे, बिरप्पा करमल, बाळासाहेब नागरगोजे, प्रकाश मांडगे, महिला पोलीस अंमलदार चिमा काळे तसेच सुपा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तरीत्या केली.

हे सुद्धा वाचा :  जिल्ह्यात तीन दिवस ‘अवकाळी’ चे संकट; यलो अलर्ट, शेतकर्‍यांना सावधानतेचा इशारा
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ