- जाहिरात -spot_img
breaking news

शिवरायांच्या पुतळ्यावरून सोलापुरात राडा, तहसीलदाराच्या गाडीवर दगडफेक, पोलिसांवरही हल्ला…

मुंबई / नगर सह्याद्री –
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यावरून सोलापुरातील अंजनगाव खेलोबामध्ये मोठा राडा झाला. रात्रीतून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आल्याने दोन गटात वाद निर्माण झाला. यामुळे गावात सामाजिक तणाव निर्माण झाला आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी गावात जमाव बंदी आदेश लागू करण्यात आले आहेत.

अंजनगाव खेलोबा या गावात माढा तहसीलदारांच्या गाडीवर संतप्त जमावाने दगडफेक केली होती. या दगडफेकीमध्ये गाडीची मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. बुधवारी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारल्यावरून दोन गटांमध्ये वाद निर्माण झालाय. त्या वादातूनच रात्री संतप्त जमावाने पोलिसांवर देखील दगडफेक केली होती. याच दरम्यान तहसीलदारांच्या गाडीवर देखील जमावाने दगडफेक करून गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. सध्या या गावांमध्ये तणावपूर्ण वातावरण असून पोलीस देखील मोठ्या प्रमाणावरती दाखल झाले आहेत.

पोलिसांनी लाठी चार्ज केल्यानंतर दगडफेक; स्थानिक ग्रामस्थांचा आरोप
माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवल्याचा वाद चांगलाच पेटला आहे. पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांवर लाठी चार्ज करून मारहाण केली.त्यानंतर दगड फेक झाली. या घटनेला पोलिस जबाबदार आहेत, असा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्यानंतर दोन गट आमने-सामने आले होते. रात्री पोलीस प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याचा प्रयत्न केला असता, काही तरुणांनी विरोध केला होता. यावेळी पोलिसांनी विरोध करणाऱ्या तरुणांवर लाटी चार्ज करून मारहाण केली. या मारहाणीमध्ये काही तरुणांची डोके फुटली तर अनेकांचे पाय मोडल्याचे समोर आले आहे. या घटनेला पोलीस प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप जखमी तरुणांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांची चौकशी करावी अशी मागणी आता पुढे आले आहे.

गावात तणावपूर्ण शांतता
माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याप्रकरणी दोन गटांमध्ये तुफान राडा झाला आहे.त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी गावात तणावपूर्ण शांतता आहे. दरम्यान रात्री दगडफेकी मध्ये तहसीलदारांच्या गाडीचे नुकसान करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून स्थानिक दोन गट आमने सामने आले होते. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी गावात तणावपूर्ण शांतता आहे.असून गावात पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर लावण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा :  शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आंदोलन, काय घडलं पहा..
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ