हिंदू धर्मांतर व लव्ह जिहाद विरोधात कडक कायदा आणावा – आमदार संग्राम जगताप यांची मागणी | जनआक्रोश मोर्चात महिलांसह शेकडो हिंदू नागरिकांचा सहभाग
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
भारतामध्ये आजपर्यंत एकही मुस्लिमचे हिंदू धर्मात बळजबरीने धर्मांतर झालेले नाही. पण भारतासह भारताबाहेरीलही हिंदू आज धर्मांतरामुळे असुरक्षित आहेत. त्यामुळे या धर्मांतर करणार्या जिहादी वृत्तीच्या व पाद्रींच्या कामाला प्रखर विरोध होण्यासाठी केवळ मोर्चे काढून उपयोग नाही तर आपल्या भागात कोणत्याही हिंदूचे धर्मांतर होणार नाही यासाठी प्रत्येकाने जागरूकपणे लक्ष ठेवून काम करावे. राज्य सरकारने व केंद्र सरकारने तातडीने धर्मांतर विरोधात व लव्ह जिहाद विरोधात चांगला कडक कायदा आणावा. जेणेकरून कोणताच नि:ष्पाप हिंदू धर्मांतरास बळी पडणार नाही, अशी मागणी आ.संग्राम जगताप यांनी केली.
सांगली शहरातील ऋतुजा राजगे या विवाहित गर्भवती महिलेने सासरी ख्रिश्चन धर्म स्वीकारावा यासाठी झालेल्या छळामुळे आत्महत्या केली या घटनेच्या निषेधार्थ व धर्मांतर विरोधी कायदा राज्यात व देशात लागू झाला पाहिजे या मागणीसाठी आमदार संग्राम जगताप यांच्या पुढाकारातून रविवारी सकाळी अहिल्यानगर शहरात जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून मार्केट यार्ड चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत हा जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी मार्केट यार्ड चौकात झालेल्या सभेस आ. संग्राम जगताप, आमदार गोपीचंद पडळकर, पुण्याच्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्या वर्षा डहाळे व आदिनाथ पालवे महाराज आदींसह मोठ्या संख्येने हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मोर्च्यात सहभागी झालेल्या महिलांनी पेटत्या मशाली व धर्मांतर विरोधी कायद्याची मागणी करणारे फलकही हातात घेतले होते. भर उन्हात झालेल्या या सभेस मोठ्याप्रमाणात गर्दी झाली होती.
आ. जगताप पुढे म्हणाले, सांगली जिल्ह्यातील ऋतुजा राजगे या उच्चशिक्षित हिंदू भगिनीची सोशल मीडियाच्या माध्यमातून फसवणूक करून लग्नानंतर ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी सासरच्या लोकांकडून छळ केला गेला. पण ती भगिनी ठाम राहत धर्मांतर केले नाही. तर छत्रपती संभाजी महाराजांप्रमाणे बलिदान पत्करले. तिचे हे बलिदान कधी विसरता कामा नये. हिंदूंचे असे धर्मांतर थांबवण्यासाठी तातडीने देशात व राज्यात धर्मांतरविरोधी कायदा होणे आवश्यक आहे. वेगवेगळ्या मार्गाने सातत्याने हिंदू धर्मावर हल्ले होत आहेत. हे हल्ले थोपवण्यासाठी आपण धर्मासाठी एकत्र येणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे लव्ह जिहाद विरोधात व लोकसंख्या नियंत्रण कायदा ही तातडीने अमलात आला पाहिजे.
आ.गोपीचंद पडळकर म्हणाले, राज्यात सर्वात जास्त हिंदूंचे धर्मांतर हे अहिल्यानगर जिल्ह्यात होत आहे. त्यामुळे सर्व हिंदू नागरिकांनी जागृत राहून या जिहादी व ख्रिश्चन पाद्रींना आपल्या भागातून हाकलून द्या. जिल्हाधिकार्यांनी व प्रत्येक तालुयातील तहसीलदारांनी बेकायदेशीरपणे उभा राहिलेल्या मशिदी व चर्च त्यांची शहानिशा करून तातडीने त्याच्यावर बुलडोझर फिरवला पाहिजे. अनेक जण जातीने ख्रिश्चन आहेत पण शासकीय आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी ते कागदोपत्री एससी एसटी किंवा ओबीसी असल्याचे दाखवतात शासकीय लाभ व नौकरी करत आहेत. अशा फसवणूक करणार्या शासकीय कर्मचार्यांचा शोध घेऊन त्यांच्या विरोधातही बडतर्फची कारवाई झाली पाहिजे. मी, आमदार संग्राम जगताप व मंत्री नितेश राणे यांनी हिंदू विरोधात होणार्या कटकारस्थानांना जशास तसे उत्तर देण्याचे ठरवले आहे.
जे संविधान मानत नाहीत, भारत माता की जय म्हणत नाहीत, राष्ट्रगीत म्हणत नाही अशांना भारताबाहेर काढण्यासाठी आमच्या प्रयत्न आहे. येणार्या अधिवेशनामध्ये धर्मांतर विरोधी कायदा होण्यासाठी राज्यभर असे शक्ती ऋतुजा मोर्चे काढून सरकारकडे मागणी करण्यात येत आहे. तसेच ज्यांचे धर्मांतर मुस्लिम ख्रिश्चन धर्मात झाले आहे अशांनाही पुन्हा हिंदू धर्मात आणण्यासाठी कायदा करावा, अशी मागणी सरकारकडे करत आहोत.
वर्षा डहाळे यांनीही सभेत घडलेल्या विविध घटनाचे दाखले देत परखडपणे विचार व्यक्त करत धर्मांतर विरोधी कायद्याची मागणी केली. सभेचे सूत्रसंचालन दिनेश जोशी यांनी केले. चंद्रकांत काळोखे यांनी आभार मानले.