शिर्डी / नगर सह्याद्री –
साई संस्थानच्या या निर्णयामुळे सामान्य साईभक्तांना मोठा दिलासा मिळणार आहे. भक्तांचा दर्शनरांगेत जाणारा वेळ वाचण्यास मदत होणार आहे.
साई संस्थानने ब्रेक दर्शन व्यवस्था सुरु केली आहे. यामुळे व्हीआयपी लोकांना दर्शनासाठी ठराविक वेळ देण्यात येणार आहे. सामान्य भक्तांना दर्शनासाठी ताटकळत थांबावे लागू नये, यासाठी हा निर्णय साई संस्थानने घेतला आहे. साई मंदिरात महत्वाच्या व्यक्तींच्या दर्शनासाठी नेहमी दर्शन रांग थांबवली जात होती. त्यामुळे सामान्य भक्तांना खूप त्रास व्हायचा.