spot_img
अहमदनगरAhmadnagar: 'शिवसेना शहरप्रमुखा विरोधात व्यापारी आक्रमक' कामगारांवर उपासमारीची वेळ, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार,...

Ahmadnagar: ‘शिवसेना शहरप्रमुखा विरोधात व्यापारी आक्रमक’ कामगारांवर उपासमारीची वेळ, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार, नेमकं प्रकरण काय?

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री-

नगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी मार्केटच्या आवारात १९९७ सालापासून २५ ते ३० व्यापारी फुलाचा व्यवसाय करतात. शेतकरी मोठ्या संख्येने विविध प्रकारचे फुलं येथे विक्रीसाठी आणतात. शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी फुल विक्रेत्यांच्या गाळ्यांविरोधात अर्ज करून गाळे पाडण्यासाठी पाठपुरावा सुरु केला आहे. त्यामुळे व्यापारी व कामगार यांच्यावर उपासमारीची वेळ येईल असा आरोप करत फुल विक्रेते सातपुतेंविरोधात आक्रमक झाले असून ते याबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचा इशारा व्यापार्‍यांनी दिला.

मार्केट यार्डमध्ये फुलविक्रेत्यांची बैठक पार पडली. यावेळी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जाधव, बापूसाहेब जासूद, अजय गारदे, वसंत आगरकर, संतोष गोंधळे, दिलीप आसमर, मुश्ताक सय्यद, लियाकत सय्यद, नसीम खान, सचिन मेहेत्रे, रशीद खान, अयाज शेख, अनिकेत आगरकर, सूरज कोके, शब्बीर सय्यद, राहुल शेरकर, बाबासाहेब ठोकळ, किरण जाधव, मछिंद्र कातोरे, कैलास धाडगे, अजय तिवारी, प्रकाश आगरकर आदी उपस्थित होते.

यावेळी व्यापार्‍यांनी म्हटले आहे की, कोविडमुळे ३ वर्षांपासून फुलविक्रेते आर्थिक संकटात सापडले आहेत. फुलांना योग्य भाव मिळत नव्हते. त्यातच फुल विक्रेत्यांचे गाळे पाडण्याचा निर्णय झाला. आमची रोजीरोटी बंद करून आमच्यावर अन्याय का करता? तुमच्या दुश्मनीसाठी आमचा बळी का देता? असा सवाल व्यापार्‍यांनी केला. जर तुम्ही आमच्या व्यवसाय व घरापर्यत येत असाल तर आम्ही रस्त्यावर उतरू. लवकरच फुलविक्रेत्यांची कमिटी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन तक्रार करणार असल्याचे व्यापार्‍यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...