spot_img
अहमदनगरसुपेकरांना खुशखबर! पालकमंत्र्यांच्या सुचनेनंतर रोज मिळणार 'इतके' लीटर पाणी

सुपेकरांना खुशखबर! पालकमंत्र्यांच्या सुचनेनंतर रोज मिळणार ‘इतके’ लीटर पाणी

spot_img

पारनेर । नगर सहयाद्री
सुपेकरासाठी गोड बातमी समोर आली आहे. गावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी एक मार्ग मोकळा झाला आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेनंतर औद्योगिक वसाहतीमधून सुपा ग्रामपंचायतीला दररोज ३ लाख लिटर पाणी मिळणार आहे.

गावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सरपंच मनीषा योगेश रोकडे, माजी उपसरपंच दत्तात्रय पवार, सागर मैड, पप्पू पवार, प्रताप शिंदे, सुरेश नेटके, सदस्य अनिता पवार, युवा नेते योगेश रोकडे यांनी सुप्याची नोंदणीकृत लोकसंख्या व आज रोजी सुप्यात वास्तव्यास असलेले नागरिक यांची तफावत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील पारनेर तालुक्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांच्या समोर मांडली.

सुप्यासाठी काम सुरू असलेली विसापूर पाणी योजना चालू होईपर्यंत सुपा औद्योगिक वसाहतीतून पाणी सोडावे अशी विनंती केली. विखे पाटील यांनी तात्काळ औद्योगिक वसाहतीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

औद्योगिक वसाहतीचा पुरवठा होऊन ३ लाख लिटर पाणी देणे शक्य असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट करताच लगेचच याबाबत कार्यवाही पूर्ण करण्यात आली. ग्रामपंचायत पदाधिकारी व औद्योगिक वसाहत पाणीपुरवठा अधिकारी यांनी मनाचा मोठेपणा दाखवत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या हस्ते सुपा शहरासाठी पाणीपुरवठा चालू केला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राखेतून फिनिक्ससारखी भरारी — माजी सैनिक नवनाथ खामकर यांचा संकल्प एस. मार्ट पुन्हा उभा

  श्रीगोंदा / नगर सह्याद्री - राखेतून पुन्हा जन्म घेणाऱ्या फिनिक्स पक्षासारखी किमया श्रीगोंद्यात पाहायला मिळाली...

स्थानिक स्वराज्य संस्थांनच्या निवडणुका संभाजी ब्रिगेड ताकदीने लढवणार – इंजी. शामभाऊ जरे

श्रीगोंदा / नगर सह्याद्री दिवाळीनंतर होणाऱ्या नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी संभाजी ब्रिगेड...

ओबीसी आरक्षण कमी झाल्याचा पुरावा आहे का? राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणाले पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - ओबीसी आरक्षणावरून शुक्रवारपासून वातावरण पुन्हा तापले आहे. बीडमध्ये ओबीसी...

अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना 846 कोटी 96 लाख रुपयांची मदत; पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

अहिल्यानगर | नगर सह्याद्री सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर...