spot_img
अहमदनगरसुपेकरांना खुशखबर! पालकमंत्र्यांच्या सुचनेनंतर रोज मिळणार 'इतके' लीटर पाणी

सुपेकरांना खुशखबर! पालकमंत्र्यांच्या सुचनेनंतर रोज मिळणार ‘इतके’ लीटर पाणी

spot_img

पारनेर । नगर सहयाद्री
सुपेकरासाठी गोड बातमी समोर आली आहे. गावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी एक मार्ग मोकळा झाला आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेनंतर औद्योगिक वसाहतीमधून सुपा ग्रामपंचायतीला दररोज ३ लाख लिटर पाणी मिळणार आहे.

गावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सरपंच मनीषा योगेश रोकडे, माजी उपसरपंच दत्तात्रय पवार, सागर मैड, पप्पू पवार, प्रताप शिंदे, सुरेश नेटके, सदस्य अनिता पवार, युवा नेते योगेश रोकडे यांनी सुप्याची नोंदणीकृत लोकसंख्या व आज रोजी सुप्यात वास्तव्यास असलेले नागरिक यांची तफावत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील पारनेर तालुक्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांच्या समोर मांडली.

सुप्यासाठी काम सुरू असलेली विसापूर पाणी योजना चालू होईपर्यंत सुपा औद्योगिक वसाहतीतून पाणी सोडावे अशी विनंती केली. विखे पाटील यांनी तात्काळ औद्योगिक वसाहतीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

औद्योगिक वसाहतीचा पुरवठा होऊन ३ लाख लिटर पाणी देणे शक्य असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट करताच लगेचच याबाबत कार्यवाही पूर्ण करण्यात आली. ग्रामपंचायत पदाधिकारी व औद्योगिक वसाहत पाणीपुरवठा अधिकारी यांनी मनाचा मोठेपणा दाखवत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या हस्ते सुपा शहरासाठी पाणीपुरवठा चालू केला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सिस्पे विरोधात ठेवीदार आक्रमक; पाच दिवसात पैसे जमा न झाल्यास…, काय दिलाय इशारा पहा

  पारनेर / नगर सह्याद्री- पारनेर, सुपा परिसरातील सुमारे चारशे कोटी रूपयांना गंडा घालणाऱ्या 'सिस्पे कंपनी'...

नगरसेवकाची आरोग्य अधिकाऱ्यास दमबाजी; मनपा कर्मचाऱ्यांनी घेतला मोठा निर्णय

मनपा अधिकारी, कर्मचाऱ्यांना दमदाटी, शिवीगाळ करण्याचे प्रकार वाढले असून संबंधितांवर कारवाई करावी - सचिव...

कामात अडथळा, जीव मारणे प्रकरणी नगरसेवक कोतकर, बोराटेंवर एफआयआर, काय घडलं पहा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सतीश बाबूराव राजुरकर यांच्या तक्रारीवरून नगरसेवक...

आमदार माजलेत….; विधानसभेत फडणवीस संतापले, काय घडलं जाणून घ्या

मुंबई / नगर सह्याद्री - विधानभवनात गुरुवारी झालेल्या गोंधळामुळे संपूर्ण विधिमंडळाच्या प्रतिष्ठेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं...