spot_img
अहमदनगरठेवीदारांचे ६० कोटी परत मिळणार? अर्बन बँकेची 'इतक्या' कोटींची कर्ज वसुली, वाचा...

ठेवीदारांचे ६० कोटी परत मिळणार? अर्बन बँकेची ‘इतक्या’ कोटींची कर्ज वसुली, वाचा सविस्तर

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री
रिझर्व बँकेने नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा बँकिंग परवाना रद्द केल्यानंतर केंद्र शासनाने बँकेवर नोव्हेंबर २०२३ मध्ये अवसायक म्हणून एनसीडीसीचे संचालक गणेश गायकवाड यांची नियुक्ती केली होती. दरम्यानच्या पाच महिन्यांच्या कालावधीमध्ये २३ एप्रिलअखेर बँकेच्या थकीत कर्जापैकी १२ कोटी ७८ लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत.

याचबरोबर पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात १७ हजार २०० ठेवीदारांचे २९३.५७ कोटी रुपये डीआयसीजीसीच्या माध्यमातून परत करण्यात आले असून १४ हजारांचे ४८५ ठेवीदारांच्या क्लेम फॉर्मची पूर्तता झालेली असून त्यांचे ६० कोटी रुपये डीआयसीजीसीच्या माध्यमातून लवकरच परत करण्यात येणार असल्याची माहिती बँक प्रशासनाकडून देण्यात आली.

नवीनआर्थिक वर्षामध्ये थकीत कर्ज वसुलीची प्रक्रिया अधिक तीव्र करण्यात येणार असून अशा कर्जदारांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. संभाव्य कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी सर्व थकीत कर्जदारांनी थकबाकीची रक्कम लवकरात लवकर भरून बँक प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन अवसायक गणेश गायकवाड यांनी केले आहे.

त्याचबरोबर सर्व खातेदार व ठेवीदार यांनी आपापले केवायसी कागदपत्र नजीकच्या शाखेत जमा करून ठेवी परत मिळवण्यासाठी क्लेम फॉर्म देखील लवकरात लवकर भरून द्यावेत असे आवाहन देखील गायकवाड यांनी केले आहे. थकीत कर्जाची वसुली करून ठेवीदारांना त्यांचे पैसे परत करण्यासाठी बँक प्रशासन प्रयत्नशील असल्याचे देखील यावेळी गायकवाड यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सिस्पे विरोधात ठेवीदार आक्रमक; पाच दिवसात पैसे जमा न झाल्यास…, काय दिलाय इशारा पहा

  पारनेर / नगर सह्याद्री- पारनेर, सुपा परिसरातील सुमारे चारशे कोटी रूपयांना गंडा घालणाऱ्या 'सिस्पे कंपनी'...

नगरसेवकाची आरोग्य अधिकाऱ्यास दमबाजी; मनपा कर्मचाऱ्यांनी घेतला मोठा निर्णय

मनपा अधिकारी, कर्मचाऱ्यांना दमदाटी, शिवीगाळ करण्याचे प्रकार वाढले असून संबंधितांवर कारवाई करावी - सचिव...

कामात अडथळा, जीव मारणे प्रकरणी नगरसेवक कोतकर, बोराटेंवर एफआयआर, काय घडलं पहा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सतीश बाबूराव राजुरकर यांच्या तक्रारीवरून नगरसेवक...

आमदार माजलेत….; विधानसभेत फडणवीस संतापले, काय घडलं जाणून घ्या

मुंबई / नगर सह्याद्री - विधानभवनात गुरुवारी झालेल्या गोंधळामुळे संपूर्ण विधिमंडळाच्या प्रतिष्ठेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं...