spot_img
अहमदनगरMaratha Reservation:..मरण आले तरी बेहत्तर, गुलाल घेऊनच परतणार: मनोज जरांगे पाटील

Maratha Reservation:..मरण आले तरी बेहत्तर, गुलाल घेऊनच परतणार: मनोज जरांगे पाटील

spot_img

सुपा / नगर सह्याद्री
शासनाला सात महिन्यांचा कालावधी देऊनही आरक्षण मिळत नसेल तर हा सकल मराठा समाजाचा अपमान आहे. वारंवार आंदोलने, उपोषण करून सरकारला फरक पडत नसेल तर आता मरण आले तरी बेहत्तर, आरक्षण घेऊनच मागे परतणार असल्याचे प्रतिपादन मराठी बांधवांचा शूर योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केले.

सकल मराठा समाजाचा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या पदयात्रेला २० जानेवारी रोजी अंतरवली सराटी येथून सुरूवात झाली आहे. सोमवार दि. २२ रोजी ऐतिहासिक पारनेर तालुक्यातील सुपा येथील सरदार श्रीमंत शाबुशिंग पवार मैदानावर हे भगवे वादळ धडकताच पारनेर श्रीगोंदा तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी मराठी बांधवांना संबोधित केले यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, अहमदनगर जिल्ह्यातील सर्व सकल मराठा समाजाच्या बांधवांना विनंती आहे की, मी तुमच्या जीवावर मुंबई कडे कुच करत आहे, माझ्या वर विश्वास ठेवा मी गुलाल घेऊनच घरी येईल विश्वास ठेवा. मी मरणाला भीत नाही, आता माघार नाही, सरकारने लय प्रयत्न केले पण मी मॅनेज होणार्यातला नाही. म्हणून त्यांचे फगाणा. आता मात्र मुंबईत भगवे वादळ निर्माण होणार यात शंका नाही. आर्धी लढाई आपण जिंकलो आहे आता फक्त थोडी लढाई बाकी आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की, मी असेन किंवा नसेल तुम्ही मात्र एकत्र रहा का देत नाही आपण घेतल्याशिवाय राहणार नाही. असेही जरांगे पाटील म्हणाले.

सुप्यात भगव्या वादळाचे जंगी स्वागत
पारनेर व श्रीगोंदा तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने सुमारे १७० एकर क्षेत्रावर मराठी बांधवांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली. पारनेर सकल मराठा समाजाच्या वतीने लापशी व मसाला भात महाभोजनाचे तर श्रीगोंदा तालुक्याच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. पारनेर व श्रीगोंदा तालुक्यातील मराठी बांधवांच्या वतीने नाष्टा व भोजनासाठी सुमारे ५१ स्टॉल लावण्यात आले.यामध्ये केळी, शाबुदाना खिचडी, लापशी, मसाले भात, भाकरी, चपाती, मिरची,बेसण, दाळी आदींच्या गाड्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यादरम्यान संपूर्ण सुपा शहर भगवे झाले होते.

आठ जेसीबीच्या सहाय्याने पुष्प वृष्टी
ऐतिहासिक पारनेर तालुक्यात मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील दाखल होताच सुमारे आठ जेसीबीच्या सहाय्याने मनोज जरांगे पाटील यांच्यावर पुष्प वृष्टी करण्यात आली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहमदनगर नव्हे आता अहिल्यानगर रेल्वेस्थानक, रेल्वेस्टेशनचेही नाव बदलले, सरकारकडून प्रक्रिया पूर्ण

अहिल्यानगर / नगर सह्याद्री : अहिल्यानगरचे नामांतर केल्यानंतर आता रेल्वेस्थानकाच्या नामांतराचीही प्रक्रिया पूर्ण झाली आहे....

तयारीला लागा! जिल्हा परिषद अध्यक्ष पदांच्या आरक्षणाचा फुगा फुटला, अनेक दिग्गजांना मोठा धक्का, कुठे काय निघाले आरक्षण पहा

अहिल्यानगर झेडपीचे अध्यक्षपद अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव / जिल्ह्यातील दिग्गजांना मोठा धक्का | राज्यातील...

एसईबीसी, ईडब्लूएस, ओपन आरक्षण नको का?; मंत्री छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले पहा

मराठा समाजाला सवाल | नेत्यांनाही धरले धारेवर नाशिक | नगर सह्याद्री राज्यातील मराठा समाजाला आतापर्यंत त्यांच्यासाठी...

धक्कादायक! हायकोर्ट बॉम्बने उडवण्याची धमकी, दिल्ली, मुंबईत खळबळ

नवी दिल्ली | वृत्तसंस्था दिल्लीतील नामांकित शाळा बॉम्बस्फोट करून उडवून देण्याची धमकी ताजी असतानाच आता...