spot_img
देशBreaking News : देशभरात एम.फील डिग्रीचे शिक्षण होणार कायमचे बंद ! पहा...

Breaking News : देशभरात एम.फील डिग्रीचे शिक्षण होणार कायमचे बंद ! पहा सर्वात मोठा निर्णय

spot_img

नवी दिल्ली / नगर सहयाद्री : शिक्षणे क्षेत्रातून एक मोठी बातमी आली आहे. यूजीसीने एक मोठा निर्णय घेतला आहे. महाविद्यालयीन एम. फील डिग्री कायमची बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या निर्णयानुसार आता देशभरातील सर्व महाविद्यालयांना एम. फील डिग्रीचं अ‍ॅडमिशन न देण्याचे आदेश दिले गेले आहेत. यूजीसीकडून याबाबतचा आदेश आजच पारित करण्यात आला असून आता पुढच्या शैक्षणिक वर्षापासून एम. फील डिग्रीसाठी अ‍ॅडमिशन अधिकृतपणे बंद केले जाणार आहे.

यूजीसीने याबाबत नोटीस जारी केली आहे. एम. फील मान्यताप्राप्त डिग्री नाही, असं युसीजीने स्पष्ट केलं आहे. एम. फील म्हणजेच मास्टर ऑफ फिलॉसॉफी डिग्री ही दोन वर्षांची पोस्टग्रॅज्युएट अ‍ॅकेडमिक रिसर्च प्रोग्राम होतं, जे पीएचडीसाठी प्रोव्हिजन इनरोलमेंटसारखं काम करतं. पण आता युजीसीने डिग्रीची मान्यता रद्द केल्याने आता विद्यार्थ्यांना या कोर्ससाठी अ‍ॅडमिशन घेता येणार नाही.

यूजीसीने आता असं म्हटलं आहे की, काही महाविद्यालयातून एम.फीलच्या शिक्षणासाठी प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना आमंत्रित करत आहेत. पण महाविद्यालयांनी तसं करु नये. कारण ही डिग्री मान्यता प्राप्त नाही. सण 2020 मध्येच या डिग्रीला डिस्कन्टीन्यू करण्याची शिफारस केली गेली होती. आजपासून या डिग्रीला स्पष्टपणे नोटीस काढून अमान्य करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यातच ही डिग्री बंद करण्यात आली आहे. महाविद्यालय अनुदान आयोग विनियम, 2022 तयार केला आहे, ज्याला 7 नोव्हेंबर 2022 ला भारताच्या राजपत्रात प्रकाशित करण्यात आलं आहे, असं यूजीसीने नोटीसमध्ये म्हटलं आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...