spot_img
आर्थिककांदा सोडा, आता लसूण झाला 400 रुपये किलो !

कांदा सोडा, आता लसूण झाला 400 रुपये किलो !

spot_img

नगर सह्याद्री / मुंबई
कांदा मध्यंतरी 40 ते 45 रुपये किलोपर्यंत गेला होता. परंतु निर्यात बंदीमुळे सध्या हा कांदा 18 ते 22 रुपये पर्यंत आला आहे. परंतु आता लसणाने उचल खाल्ली आहे. सध्या लसूण तब्बल 400 रुपये किलो झाला आहे. कांद्याने आतापर्यंत सर्वसामान्यांना भाववाडीतून सातत्याने रडवलं. पण आता लसणाचा ठसका जोरात लागला आहे. लसणाचे भावदेखील गगनाला भिडले आहेत.

लसणाच्या किमती का वाढल्या?
प्रतिकूल हवामान आणि अवकाळी पावसाचा परिणाम लसणावर देखील झाला आहे. पिकांच्या खराब उत्पादनामुळे लसणाच्या दरात वाढ झाली आहे. मागील आठवड्यात 200 ते 250 रुपये किलो हा लसूण होता. आता तो 350 ते 400 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. दादर बाजारपेठेत हे दर आहेत. नवीन पीक बाजारात येण्यास वेळ असल्याने तोपर्यंत भाव असेच असतील असे म्हटले जात आहे.

किती वाढले दर?
मागील महिन्यात लसणाचा दर 120 ते 140 रुपये इतका होता. हाच दर 400 रुपयांवर गेला आहे. दिवाळीच्या निमित्ताने गुजरात आणि मध्यप्रदेशमधून लातुरच्या बाजारात लसूण विक्रीला आला होता. आठवड्याला किमान 100 क्विंटल लसूण बाजारात आणला गेला होता. आता हा दर 400 रुपयांवर गेला असल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

डॉल्बी डीजे अन् लेसर लाईट्सचं काय?

पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष | जाताजाता बाप्पा म्हणाला; पुढच्या वर्षी नव्हे रे, रोजच भेटणार मी...

खा. नीलेश लंके यांना पत्र दिलेच नाही?; आ. टिळेकर यांच्याकडून ‘इन्कार’

पारनेर | नगर सह्याद्री:- मी भाजपाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. विधान परिषदेचा आमदार म्हणून मी राज्यात...

‘मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून कमी करण्याचे षडयंत्र’

अहमदनगर । नगर सहयाद्री:- शासनाला हाताशी धरून काही विघ्नसंतोषी लोक मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून...

बिबट्याच्या हल्ल्यात सात शेळ्या गेल्या; ‘या’ परिसरात ‘तीन’ बिबटे

पारनेर । नगर सहयाद्री :- तालुक्यातील पठार भागावरील गारगुंडी येथे गावाजवळील शेख वस्तीवरील आमीनभाई शेख...