spot_img
राजकारणजे अजित दादांना कळलं ते तुम्हाला कळलच नाही..! जयंत पाटलांचा फडणवीस-शिंदेंना टोला..पहा..

जे अजित दादांना कळलं ते तुम्हाला कळलच नाही..! जयंत पाटलांचा फडणवीस-शिंदेंना टोला..पहा..

spot_img

नगर सह्याद्री / नागपूर : राज्य विधिमंडळाच सध्या नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरु आहे. अवकाळीने शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान, कांदा निर्यातबंदीचा निर्णय, उसापासून इथेनॉल निर्मिती करण्यास बंदी आदींच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले जात आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शेतकरी प्रश्नावरून राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. विधानसभा निवडणुकीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परराज्यात गेले होते. यावरून त्यांनी निशाणा साधला.

काय म्हणाले जयंत पाटील?
गारपीट आणि अवकाळी पावसाने शेतकरी हैराण झाला होता. त्यावेळी सत्ताधारी शेजारच्या राज्याच्या निवडणुकीत प्रचारात व्यस्त होते. इतर राज्यांत प्रचार करण्यास आमची हरकत नाही पण इथं आपला संसार फाटला असताना दुसऱ्या राज्यात संसार जोडण्यासाठी मंत्री जातायेत हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने बरं नाही असे ते म्हणाले आहेत.

तुमचा तिकडं विजय झाला, याचा आम्हाला आनंद आहे. पण तिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक इमेज असल्यामुळे तुम्हाला जाण्याची आवश्यकता नव्हती. तुम्हाला कोण विचारतो तिकडं?” असा खरपूस सवाल जयंत पाटील यांनी करत ते म्हणाले की, आपले मुख्यमंत्री, एक उपमुख्यमंत्री प्रचारासाठी तिकडे गेले पण दुसरे उपमुख्यमंत्री गेले नाहीत असं जयंत पाटील यांनी म्हटलं.

त्यांनी असं म्हणताच अजित पवारांनी उत्तर दिलं की मी तिकडे जाऊन काय दिवे लावणार होतो? जे आहे ते मोदींच्या नावावर आहे असं ते म्हणाले. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चिमटा काढत जयंत पाटील म्हणाले की, “मी पण तेच म्हणतोय…जे दादांना कळलं ते तुम्हाला कळलं नाही.” असा खोचक सवाल त्यांनी लगावला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ट्रॅक्टरच्या टायरमध्ये का भरलं जात पाणी? अनेकांना पडलेला महत्वाचा प्रश्न, वाचा त्यामागचं कारण

मुंबई । नगर सहयाद्री:- आपण इतर वाहनांच्या टायरमध्ये हवा भरतो, पण ट्रॅक्टरच्या टायरमध्ये हवेऐवजी...

बाप रे! बर्फाच्या कारखान्यात धक्कादायक प्रकार; कामगाराच्या डोक्यात ‘इतके’ टाके

जामखेड । नगर सहयाद्री:- जामखेड येथे बर्फ कारखान्यात गेल्या आठ वर्षापासून कामाला असलेल्या परप्रांतीय...

मेहुणीला करायचं होतं भाऊजीला खूश, पुढे घडलं असं काही….

Crime News : सोशल मीडियावर लाईक्स आणि कमेंट्स मिळवण्यासाठी काही लोक कोणत्याही स्तरावर जाऊन...

अजबच! ‘सिबिल स्कोअर’ खराब असल्याने मोडलं लग्न..

Maharashtra News: सामान्य ग्राहकाला कर्ज देताना बँका त्या ग्राहकाच्या परतफेडीच्या क्षमतेसोबतच त्याच्या ‘सिबिल स्कोअर’चासुद्धा...