spot_img
देशकाल 'अवकाळी' पावसाची तुफान बॅटींग! आज हवामान खात्याचा 'या' जिल्ह्यांना महत्त्वाचा अलर्ट

काल ‘अवकाळी’ पावसाची तुफान बॅटींग! आज हवामान खात्याचा ‘या’ जिल्ह्यांना महत्त्वाचा अलर्ट

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री-
एप्रिल महिन्यांच्या सुरवातीपासूनच देशासह राज्याच्या हवामानात बदल पाहायला मिळत आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात ‘अवकाळी’ पावसाने राज्यातील हजेरी लावली आहे. आज पुन्हा हवामान खात्याने पुढिल २४ तासात विजांसह पावसाचा अलर्ट दिला आहे.

आकाशात काळ्या ढगांची गर्दी आणि अधुनमधून वीज चमकतनाही दिसत आहे. समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. वाऱ्याचा जोरही जास्त असल्याने पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे. त्यामुळे राज्यात पुढील २४ तासात पावसाच्या सरी पाहायला मिळतील.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, विदर्भातील बुलडाणा, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर जिल्ह्याना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस येण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे.

काल ‘अवकाळी’ पावसाची तुफान बॅटीं!
विदर्भातील अमरावती जिल्ह्यात गारपिटीने पिकांचे नुकसान झाले. तर चंद्रपूर, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली. यवतमाळ जिल्ह्यामध्ये मंगळवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकाचे अतोनात नुकसान झाले. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील काही गावांना वादळाचा तडाखा बसला. या वादळामुळे घरांसह शेती पिकांचं मोठे नुकसान झाले. अकोला जिल्ह्यातील चार तालुक्यांना अवकाळी पावसाने झोडपून काढले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मर्चंट्स बँकेला रिझर्व्ह बँकेकडून ‌’शेड्यूल्ड बँक‌’ दर्जा प्राप्त

विश्वासार्हता, कार्यक्षमता आणि व्यावसायिक विस्तारात वाढ होणार: हस्तीमल मुनोत अहिल्यानगर । नगर सहयाद्री अहिल्यानगरच्या आर्थिक क्षेत्रात...

भिंगार शहरासाठी आता स्वतंत्र नगरपालिका; जिल्हा नियोजन समितीतून मिळणार निधी

अहिल्यानगर । नगर सहयाद्री येथील भिंगार शहरासाठी स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचा धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र...

निळवंडे ८२ तर जायकवाडी ७0 टक्के भरले; भंडारदरा धरणात किती पाणीसाठा?, वाचा सविस्तर

आहिल्यानगर । नगर सहयाद्री:- मराठवाड्यासाठी जीवनदायिनी असणाऱ्या जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागर धरणात पाणीसाठा वाढत आहे....

‘हुजूर मराठे आ रहे हे’! मनोज जरांगे पाटलांची मोठी घोषणा; ‘या’ तारखेला मुंबईकडे कूच करणार

बीड । नगर सहयाद्री  येत्या 29 ऑगस्ट रोजी केवळ दोन दिवसासाठी मुंबईला या, तिसऱ्या दिवशी...