spot_img
देशकाल 'अवकाळी' पावसाची तुफान बॅटींग! आज हवामान खात्याचा 'या' जिल्ह्यांना महत्त्वाचा अलर्ट

काल ‘अवकाळी’ पावसाची तुफान बॅटींग! आज हवामान खात्याचा ‘या’ जिल्ह्यांना महत्त्वाचा अलर्ट

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री-
एप्रिल महिन्यांच्या सुरवातीपासूनच देशासह राज्याच्या हवामानात बदल पाहायला मिळत आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात ‘अवकाळी’ पावसाने राज्यातील हजेरी लावली आहे. आज पुन्हा हवामान खात्याने पुढिल २४ तासात विजांसह पावसाचा अलर्ट दिला आहे.

आकाशात काळ्या ढगांची गर्दी आणि अधुनमधून वीज चमकतनाही दिसत आहे. समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. वाऱ्याचा जोरही जास्त असल्याने पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे. त्यामुळे राज्यात पुढील २४ तासात पावसाच्या सरी पाहायला मिळतील.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, विदर्भातील बुलडाणा, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर जिल्ह्याना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस येण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे.

काल ‘अवकाळी’ पावसाची तुफान बॅटीं!
विदर्भातील अमरावती जिल्ह्यात गारपिटीने पिकांचे नुकसान झाले. तर चंद्रपूर, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली. यवतमाळ जिल्ह्यामध्ये मंगळवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकाचे अतोनात नुकसान झाले. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील काही गावांना वादळाचा तडाखा बसला. या वादळामुळे घरांसह शेती पिकांचं मोठे नुकसान झाले. अकोला जिल्ह्यातील चार तालुक्यांना अवकाळी पावसाने झोडपून काढले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सिस्पे विरोधात ठेवीदार आक्रमक; पाच दिवसात पैसे जमा न झाल्यास…, काय दिलाय इशारा पहा

  पारनेर / नगर सह्याद्री- पारनेर, सुपा परिसरातील सुमारे चारशे कोटी रूपयांना गंडा घालणाऱ्या 'सिस्पे कंपनी'...

नगरसेवकाची आरोग्य अधिकाऱ्यास दमबाजी; मनपा कर्मचाऱ्यांनी घेतला मोठा निर्णय

मनपा अधिकारी, कर्मचाऱ्यांना दमदाटी, शिवीगाळ करण्याचे प्रकार वाढले असून संबंधितांवर कारवाई करावी - सचिव...

कामात अडथळा, जीव मारणे प्रकरणी नगरसेवक कोतकर, बोराटेंवर एफआयआर, काय घडलं पहा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सतीश बाबूराव राजुरकर यांच्या तक्रारीवरून नगरसेवक...

आमदार माजलेत….; विधानसभेत फडणवीस संतापले, काय घडलं जाणून घ्या

मुंबई / नगर सह्याद्री - विधानभवनात गुरुवारी झालेल्या गोंधळामुळे संपूर्ण विधिमंडळाच्या प्रतिष्ठेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं...