spot_img
अहमदनगरअहमदनगर: दुर्देवी घटना! मांजरीला वाचवताना पाच जणांचा मृत्यू, नेमक घडलं काय?

अहमदनगर: दुर्देवी घटना! मांजरीला वाचवताना पाच जणांचा मृत्यू, नेमक घडलं काय?

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री-
जिल्ह्यातुन एक दुर्देवी घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. एकाच कटूंबातील ५ जणांच्या मृत्यूमुळे नेवासा तालुक्यातील वाकडीमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. माणिक गोविंद काळे, संदीप माणिक काळे, बबलू अनिल काळे, अनिल बापूराव काळे आणि बाबासाहेब गायकवाड अशी शोष खड्ड्यात बुडालेल्या लोकांची नावे आहेत.

अधिक माहिती अशी: नेवासा तालुक्यातील वाकडी गावात सदर घटना घडली आहे. शेण-मुत्र टाकण्यासाठी एक शोषखड्डा शेतकरी कटूंबानी बनवला होता. त्या शोषखड्ड्यात मांजर पडली होती.

मांजरीला वाचवण्यासाठी एकजण बायोगॅसच्या खड्ड्यात उतरला, बायोगॅसचा खड्डा शेणाने भरलेला होता त्यामुळे त्यात विषारी वायू निर्माण झालेला होता. वाचवण्यासाठी गेलेला एक जण गुदमरून बुड लागला. ते पाहात इतकं चार जणांनी त्याला वाचवण्याच्या प्रयत्न केला पण दुर्देवाणे यात पाच जणबुडाले.

पाचजणांचा मृत्यूची माहिती मिळताच पोलीस आणि तहसीलदारांनी घटनास्थळी धाव घेतली असून आज पहाटेच्या सुमारास मृतदेह बाहेर काढण्यात प्रशासनाला यश मिळालं आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पावसाळी अधिवेशन विरोधकांनी तापवलं; पहिल्याच दिवशी काय-काय घडलं?

मुंबई | नगर सह्याद्री आजपासून (दि.३० जून) राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. हे...

पंजाबराव डख यांनी दिला शेतकऱ्यांना सल्ला; निसर्गाच्या विरोधात शेती कराल तर..

पारनेर । नगर सहयाद्री:- हवामानाचा अभ्यास करून शेती करणे ही काळाची गरज आहे. मोठ्या...

संतापजनक! पंढरपूरला निघालेल्या वारीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Maharashtra Crime News: आषाढी वारीसारख्या भक्तिभावाच्या पर्वात दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे घडलेल्या एका...

आमदार रोहीत पवार यांना धक्का; जवळच्या सहकार्यावर अविश्वासाचा ठराव..

जामखेड । नगर सहयाद्री:- कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट यांच्यावर अविश्वास ठराव...