spot_img
देशकाल 'अवकाळी' पावसाची तुफान बॅटींग! आज हवामान खात्याचा 'या' जिल्ह्यांना महत्त्वाचा अलर्ट

काल ‘अवकाळी’ पावसाची तुफान बॅटींग! आज हवामान खात्याचा ‘या’ जिल्ह्यांना महत्त्वाचा अलर्ट

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री-
एप्रिल महिन्यांच्या सुरवातीपासूनच देशासह राज्याच्या हवामानात बदल पाहायला मिळत आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात ‘अवकाळी’ पावसाने राज्यातील हजेरी लावली आहे. आज पुन्हा हवामान खात्याने पुढिल २४ तासात विजांसह पावसाचा अलर्ट दिला आहे.

आकाशात काळ्या ढगांची गर्दी आणि अधुनमधून वीज चमकतनाही दिसत आहे. समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. वाऱ्याचा जोरही जास्त असल्याने पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे. त्यामुळे राज्यात पुढील २४ तासात पावसाच्या सरी पाहायला मिळतील.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, विदर्भातील बुलडाणा, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर जिल्ह्याना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस येण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे.

काल ‘अवकाळी’ पावसाची तुफान बॅटीं!
विदर्भातील अमरावती जिल्ह्यात गारपिटीने पिकांचे नुकसान झाले. तर चंद्रपूर, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली. यवतमाळ जिल्ह्यामध्ये मंगळवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकाचे अतोनात नुकसान झाले. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील काही गावांना वादळाचा तडाखा बसला. या वादळामुळे घरांसह शेती पिकांचं मोठे नुकसान झाले. अकोला जिल्ह्यातील चार तालुक्यांना अवकाळी पावसाने झोडपून काढले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मनपा प्रारूप प्रभाग रचनेवर ठाकरे शिवसेना हरकती घेणार : शहरप्रमुख काळे

इच्छुकांची चाचपणी सुरू, आघाडी बाबत योग्य वेळी निर्णय घेऊ अहिल्यानगर / नगर सह्याद्री - अहिल्यानगर...

बिबट्याच्या हल्ल्यात पारनेर तालुक्यात 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

  कळस परिसरात ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण; वनविभागाकडे तातडीने कारवाईची मागणी गणेश जगदाळे / नगर सह्याद्री : पारनेर...

सरकार झुकलं! मागण्या मान्य पण जरांगे पाटलांनी पुन्हा सरकारला दिला ‘हा’ इशारा

मुंबई / नगर सह्याद्री - मनोज जरांगे यांच्या मागण्याचा सरकारकडून जीआर काढण्यात आला आहे....

पानटपरीवर गॅंगवार; कोयत्याने सपासप वार! शहरात गुन्हेगारांचा कहर, चाललंय काय?, वाचा सविस्तर..

Ahilyanagar Crime News: पानटपरीवर बसलेल्या युवकावर दहा जणांच्या टोळक्याने प्राणघातक हल्ला केला. मित्राचे भांडण...