spot_img
राजकारणBJP का जिंकते ? भाजपची ‘मिशन 2024’ साठी ग्राऊंड लेव्हलवर चाललेली 'अशी'...

BJP का जिंकते ? भाजपची ‘मिशन 2024’ साठी ग्राऊंड लेव्हलवर चाललेली ‘अशी’ तयारी पहाच..मग समजेल

spot_img

नवी दिल्ली / नगर सह्याद्री :
आता लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. सर्वच पक्ष आता तयारीला लागेल आहेत. यात भाजपने देखील आता कसून तयारी सुरु केली आहे. भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात 22 आणि 23 डिसेंबरला दिल्लीतील पक्ष मुख्यालयात बैठक बोलावली असून या बैठकीला देशातील सगळे प्रदेशाध्यक्ष, संघटन महामंत्री, राष्ट्रीय पदाधिकारी आणि सर्व मोर्चाचे अध्यक्ष या बैठकीसाठी येणार आहेत.

या बैठकीमध्ये इतर विषयांसोबत येत्या या लोकसभा निवडणुकीत 325 जागा जिंकण्याची रणनिती ठरवली जाणार आहे. यासाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी दोन दिवसांची बैठक बोलावली असून या बैठकीत लोकसभा निवडणूक, विकसित भारत संकल्प अभियान, विधानसभा निवडणूक समीक्षेसह अनेक मुद्यांवर चर्चा होणार आहे.

‘इतके’ कोटी मतदार मिळवण्याच असेल टार्गेट
लोकसभा निवडणुकीसाठी जेपी नड्डा यांनी 35 कोटी मतदारांच टार्गेट सेट केल आहे. 2019 मध्ये भाजपाला 22 कोटी मत मिळाली होती. जिल्हा कार्यालयात 300 पेक्षा जास्त कॉल सेंटर कार्यरत केली असून जिल्ह्यातील कार्यकर्ते आणि आमदार जनसंर्पक वाढवत आहेत. कॉल सेंटरच्या माध्यमातून 50 लाख लोकांना जोडण्याच टार्गेट आहे. पक्षासाठी सक्रीय योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांचा शोध सुरु आहे. याच कॉल सेंटरच्या माध्यमातून सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा उद्देश आहे. लाभार्थी सूचीमध्ये आणखी 70 लाख लोकांना जोडण्याच टार्गेट आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सिस्पे विरोधात ठेवीदार आक्रमक; पाच दिवसात पैसे जमा न झाल्यास…, काय दिलाय इशारा पहा

  पारनेर / नगर सह्याद्री- पारनेर, सुपा परिसरातील सुमारे चारशे कोटी रूपयांना गंडा घालणाऱ्या 'सिस्पे कंपनी'...

नगरसेवकाची आरोग्य अधिकाऱ्यास दमबाजी; मनपा कर्मचाऱ्यांनी घेतला मोठा निर्णय

मनपा अधिकारी, कर्मचाऱ्यांना दमदाटी, शिवीगाळ करण्याचे प्रकार वाढले असून संबंधितांवर कारवाई करावी - सचिव...

कामात अडथळा, जीव मारणे प्रकरणी नगरसेवक कोतकर, बोराटेंवर एफआयआर, काय घडलं पहा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सतीश बाबूराव राजुरकर यांच्या तक्रारीवरून नगरसेवक...

आमदार माजलेत….; विधानसभेत फडणवीस संतापले, काय घडलं जाणून घ्या

मुंबई / नगर सह्याद्री - विधानभवनात गुरुवारी झालेल्या गोंधळामुळे संपूर्ण विधिमंडळाच्या प्रतिष्ठेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं...