spot_img
राजकारणबच्चू कडूंकडे नेमकी कोणती मोहीम? अंतरवाली सराटीत तळ ठोकणार, सरकार व जरांगे...

बच्चू कडूंकडे नेमकी कोणती मोहीम? अंतरवाली सराटीत तळ ठोकणार, सरकार व जरांगे पाटील यांत सामंजस्य घडवणार?

spot_img

जालना / नगर सह्याद्री : आमदार बच्चू कडू हे महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री होते. परंतु शिंदे गटाने बंड केल्यानंतर ते त्यांच्यासोबत भाजपसोबत सत्तेत गेले. परंतु तेथे त्यांना मंत्रिपद मिळाले नाही. यावर अनेकदा त्यांनी
नाराजीही व्यक्त केलेली आहे.

परंतु आता ते काल रात्रीच अंतरवाली सराटीमध्ये पोहोचले असून मनोज जरांगे यांची भेट घेतली. पुढील काही दिवस ते तिथेच तळ ठोकणार आहेत. दरम्यान आज जरांगे पाटलांना समजावण्यासाठी सरकारचे शिष्टमंडळ येणार आहे.
या शिष्टमंडळामध्ये राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांच्यासह निवृत्त न्यायमूर्ती आणि मुख्यमंत्र्यांचे सचिव असणार आहेत.

यावेळी सरकारकडून मराठा आरक्षणासाठी कायदेशीर बाजू त्यांना समजवून सांगितली जाणार आहे, तसेच त्यांना उपोषण मागे घेण्यासही सांगितले जाणार आहे. बच्चू कडू हे सरकार आणि जरांगे पाटील यांच्यात मध्यस्थी करणार असल्याचे समजते आहे. सरकार आणि आंदोलकांमधील संवाद थांबला आहे.

तसेच ज्या ज्या सत्ताधाऱ्यांनी जरांगे पाटलांना फोन केला त्यांना पाटलांनी ठामपणे नकार दिला होता. परंतू, बच्चू कडूंना तिथे वेगळी वागणूक मिळाली आहे. यामुळे बच्चू कडू या दोघांमधील संवादाचा महत्वाचा दुवा ठरू शकणार आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पोलीस नागरिकांच्या संरक्षणासाठी की लुटण्यासाठी?; आमदार जगताप यांचा सवाल

अहिल्यानगर । नगर सहयाद्री: - शहरातील कोतवाली व तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चोऱ्या दरोडे महिलांच्या...

शहर विकासाच्या आड मनपाच्या टीपीची किड!

पालकमंत्री विखे पाटलांनी स्वतंत्र बैठक घेण्याची गरज | आ. जगताप यांच्या विरोधात जनमत तयार...

सत्ताधारी पुरोगामी मंडळाला मोठा धक्का! परिवर्तन मंडळाचा २१ जागांवर विजय..

अहिल्यानगर। नगर सहयाद्री:- माध्यमिक शिक्षक सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत स्वाभिमानी परिवर्तन मंडळाने २१ जागांवर मुसंडी...

कार्यकर्त्यांची फौज अन्‌‍ जीवाला जीव देणाऱ्या निष्ठावंतांचं केडर जपणारे ‘अरुणकाका’

सारिपाट / शिवाजी शिर्के नगरपालिकेचा नगराध्यक्ष म्हणून कामकाज पाहिलेल्या अरुणकाका जगताप यांनी पुढे जाऊन काही...