spot_img
राजकारणकशाची वाट बघतंय? 'अहंकाराची गोळी खाणाऱ्या सरकारला सैरावैरा..' रोहीत पवारांनी साधला सरकारवर...

कशाची वाट बघतंय? ‘अहंकाराची गोळी खाणाऱ्या सरकारला सैरावैरा..’ रोहीत पवारांनी साधला सरकारवर निशाणा

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री –

मराठा आरक्षणाचे पडसाद राज्याच्या राजकारणावर पडू लागले आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सर्वसामन्य जनता रस्त्यावर उतरली आहे.आरक्षणाबाबत सरकारने मौन धारण केल्यामुळे रोष व्यक्त होऊ लागला आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मराठा समाज आक्रम आलेला पहायला मिळत आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे. या उपोषणाच्या समर्थनार्थ संपूर्ण राज्यभरात सकल मराठा समाजाच्यावतीने साखळी उपोषण सुरू आहे.

आरक्षणाबाबत सरकार ची चाललेली चालढकल व राजकीय नेत्यांनी धारण केलेले मौन यामुळे समाजामध्ये अस्वस्थता, वाढत असून त्यांच्याबद्दल रोष व्यक्त होऊ लागला आहे. याच पार्श्वभूमीवरआमदार रोहित पवार यांनी ट्विट केलं आहे.

समाजासाठी प्रामाणिकपणे लढणारा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची तब्येत क्षणाक्षणाला खालावत चालल्याने त्यांची सर्वांनाच चिंता वाटतेय. अशा परिस्थितीत सरकार नेमकी कशाची वाट बघतंय?

सरकारला थोडीजरी काळजी असेल तर त्वरीत निर्णय घ्या आणि जरांगे पाटील यांची काळजी घ्या अन्यथा खोटेपणाची आणि अहंकाराची गोळी खाऊन आपल्याच धुंदीत असलेल्या सरकारला जीव मुठीत घेऊन सैरावैरा पळण्याची वेळ येईल. असे त्यानी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ठाकरे बंधू एकत्र: आजच्या सभेतील सर्व मुद्दे एकाच क्लिकवर

मुंबई | नगर सह्याद्री महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षणात पहिलीपासून हिंदी शिकवण्या संदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द...

नगर शहरात मध्यरात्री अघोरी प्रकार? सीसीटीव्हीमध्ये हालचाली कैद, पहा काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहरातील बागडपट्टी येथे अघोरी विद्या, करणी व जादूटोण्याचा घडल्याचा...

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट! वाचा, जिल्ह्यात कुठे किती पाऊस?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री- मे महिन्यात अहिल्यानगरमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. परंतु त्यानंतर मात्र...

सैफ अली खानला धक्का! सरकारचा मोठा निर्णय

मुंबई । नगर सहयाद्री:- सैफ अली खान याच्या भोपाळमधील पतौडी घराण्याची मालमत्ता उच्च न्यायालयानं...