spot_img
अहमदनगरAhmednagar: अर्बन बँक घोटाळा प्रकरण! गांधी दाम्पत्याचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने...

Ahmednagar: अर्बन बँक घोटाळा प्रकरण! गांधी दाम्पत्याचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने…

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री
नगर अर्बन बँकेतील कर्ज फसवणूक व कर्ज घोटाळा प्रकरणात अटकपूर्व जामीनासाठी देवेंद्र दिलीप गांधी आणि त्यांच्या पत्नी प्रगती देवेंद्र गांधी यांंनी न्यायालयात अर्ज दाखल केले होते. त्यांचे जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश पी. आर. सित्रे यांनी नामंजूर केले आहे. दरम्यान अटकेत असलेल्या संगमनेर येथील उद्योजक अमित वल्लभराय पंडित याचा जामीन अर्ज देखील न्यायाधीश सित्रे यांनी नामंजूर केला आहे.

आर्थिक गुन्हे शाखेकडून अर्बन बँक घोटाळ्याचा तपास सुरू आहे. अटकेत असलेल्या कर्जदार व बँकेच्या अधिकार्‍यांनी जामीनासाठी न्यायालयात अर्ज सादर केले आहेत. तसेच, या व्यतिरिक्त काही जणांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केले आहेत. फॉरेन्सिक ऑडिटमध्ये ठपका असलेल्या १०५ जणांची यादी लिक झाल्यानंतर अनेक संशयित पसार झाले आहेत. त्यातील काहींसह ज्यांची या यादीत नावे नाहीत अशांनीही अटकपूर्व जामीन अर्जासाठी न्यायालयात धाव घेतली आहे.

अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल करणार्‍यांमध्ये देवेंद्र दिलीप गांधी आणि त्यांच्या पत्नी प्रगती देवेंद्र गांधी यांचा समावेश होता. त्यावर बँक बचाव समिती व ठेवीदारांच्या वतीने स्वतंत्रपणे बाजू मांडण्यात आली. न्यायाधीश सित्रे यांनी गांधी पती- पत्नीचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केला आहे. तर अटकेतील पंडित याचाही जामीन अर्ज नामंजूर करण्यात आला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राखेतून फिनिक्ससारखी भरारी — माजी सैनिक नवनाथ खामकर यांचा संकल्प एस. मार्ट पुन्हा उभा

  श्रीगोंदा / नगर सह्याद्री - राखेतून पुन्हा जन्म घेणाऱ्या फिनिक्स पक्षासारखी किमया श्रीगोंद्यात पाहायला मिळाली...

स्थानिक स्वराज्य संस्थांनच्या निवडणुका संभाजी ब्रिगेड ताकदीने लढवणार – इंजी. शामभाऊ जरे

श्रीगोंदा / नगर सह्याद्री दिवाळीनंतर होणाऱ्या नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी संभाजी ब्रिगेड...

ओबीसी आरक्षण कमी झाल्याचा पुरावा आहे का? राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणाले पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - ओबीसी आरक्षणावरून शुक्रवारपासून वातावरण पुन्हा तापले आहे. बीडमध्ये ओबीसी...

अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना 846 कोटी 96 लाख रुपयांची मदत; पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

अहिल्यानगर | नगर सह्याद्री सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर...