spot_img
अहमदनगरAhmednagar News Today: सावधान! नगरमध्ये आढळले तीन कोरोना रुग्ण

Ahmednagar News Today: सावधान! नगरमध्ये आढळले तीन कोरोना रुग्ण

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री-
देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. एवढे दिवस आपल्या गावाबाहेर असलेला कोरोना आता आपल्या गावात पोचला आहे. शासकीय नोंदीनुसार राज्यात रविवारी आढळलेल्या १३१ रूग्णांपैकी तीन रूग्ण नगर जिल्ह्यातील आहेत.

महाराष्ट्रात सध्या कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. रविवारी राज्यात तब्बल १३१ नवीन कोरोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. त्यापैकी नगर जिल्ह्यात तीन रुग्ण आढळले आहेत.

कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. नाताळ आणि नववर्षामुळे पर्यटन स्थळावर गर्दी वाढली. त्यामुळे पुढील काही दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शयता आरोग्य विभागाने वर्तवली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार रविवारी राज्यात तब्बल १३१ नवीन कोरोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. अहमदनगर जिल्ह्यात तीन रुग्ण आढळले आहेत.२०२२ जानेवारीमध्ये कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेयरियंटने धुमाकूळ घातला होता. जगभरात कोरोनाची तिसरी लाट आली होती. कोरोना विषाणू म्यूटेशनमुळे नवे व्हेरियंट येत आहेत.

सध्या आलेल्या जेएन१ या कोरोना सब व्हेरियंटसाठी लसीकरणाची गरज नसल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. दरम्यान, नगर जिल्ह्यात तीन कोरोना बाधित आढळले असले तरी ते कोणत्या परिसरातील आहेत, याची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर! महत्वाचे कारण आले समोर, वाचा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था -  मागील चार ते पाच वर्षांपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या...

आधी पाप केलं, आता सल्ले देऊ नका!, निवृत्ती घ्या!; शरद पवार यांच्या टीकेला मंत्री विखे पाटलांचे प्रतिउत्तर

नाशिक । नगर सहयाद्री राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या वतीने नाशिक येथे भव्य शेतकरी...

बाजारात पोहचण्याआधीच संकट; पिकअपच्या अपघाताने हादरले ‘अहिल्यानगर’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील आठवडे बाजारासाठी जात असताना सोमवारी (१५ सप्टेंबर) दुपारी साडेतीन...

दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना खुशखबर! सरकारचा मोठा निर्णय?, समोर आली अपडेट

मुंबई ।नगर सहयाद्री:- भारत हा कृषीप्रधान देश असून कोट्यवधी शेतकरी आपल्या उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहेत....