spot_img
ब्रेकिंगनिमंत्रण फक्त राम भक्तांनाच! 'यांनी' साधला ठाकरे यांच्यावर निशाणा

निमंत्रण फक्त राम भक्तांनाच! ‘यांनी’ साधला ठाकरे यांच्यावर निशाणा

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री-
महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांना अयोध्येतील राम लल्लाच्या प्रतिष्ठापणेचे निमंत्रण अद्याप मिळालेले नाही. तसेच निमंत्रण मिळण्याची शयता कमी आहे. या संदर्भात राम मंदिराचे प्रमुख पुजारी आचार्य सत्येंद्र दास म्हणाले, २२ जानेवारीला राम मंदिराच्या लोकार्पणासाठी फक्त रामाच्या भक्तांना निमंत्रण देण्यात आले आहे. या वक्तव्याने वादात भर पडण्याची शक्यता आहे.

जे रामाचे भक्त आहे त्यांनाच निमंत्रण देण्यात आले आहे. भाजप राम मंदिराच्या नावावर राजकारण करत आहे, असे म्हणणे अत्यंच चुकीचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सर्वत्र आदर होत आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळात मोठं काम करुन दाखवले आहे.

हे काही राजकारण नाही, ही भक्ती आहे, असे दास म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराच्या मुद्यावरुन भाजपवर निशाणा साधला होता. भाजप राम मंदिरावरुन राजकारण करत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाचे उदात्तीकरण केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

आचार्य सत्येंद्र दास यांनी खा. संजय राऊत यांच्यावरही टीका केली. राऊत म्हणतात की प्रभु राम देखील भाजपकडून निवडणूक लढतील. राम मंदिराच्या मुद्यावरुन भाजप राजकीय पोळी भाजत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप राम यांचा वापर करत आहे, अशी टीका राऊत यांनी केली होती.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

वैष्णवी हगवणेचा मृत्यू कसा झाला? पोस्टमार्टममधून धक्कादायक माहिती समोर

पुणे / नगर सह्याद्री - राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे नेते राजेंद्र हगवणे यांच्या...

धक्कादायक! मुख्याध्यापिकेनेच शिक्षक पतीला संपवलं, मृतदेह टाकला जाळून, कुठे घडला प्रकार पहा

यवतमाळ / नगर सह्याद्री - महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात एक खळबळजनक हत्याकांड उघडकीस आले आहे....

IAS पूजा खेडकर प्रकरणात मोठी अपडेट; ‘सर्वोच्च न्यायालयाने जामीन..’

मुंबई । नगर सहयाद्री:- वादग्रस्त ठरलेल्या माजी आयएएस प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांना सर्वोच्च...

नगर जिल्ह्यात खळबळ! बिबट्या अडकला पिंजऱ्यात; एकाच ठिकाणी चार-चार?

अहिल्यानगर। नगर सहयाद्री :- अहिल्यानगर जिल्ह्यातील कोल्हार बुद्रुकमध्ये एकापाठोपाठ चार बिबटे जेरबंद करण्यात आले...