spot_img
ब्रेकिंगनिमंत्रण फक्त राम भक्तांनाच! 'यांनी' साधला ठाकरे यांच्यावर निशाणा

निमंत्रण फक्त राम भक्तांनाच! ‘यांनी’ साधला ठाकरे यांच्यावर निशाणा

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री-
महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांना अयोध्येतील राम लल्लाच्या प्रतिष्ठापणेचे निमंत्रण अद्याप मिळालेले नाही. तसेच निमंत्रण मिळण्याची शयता कमी आहे. या संदर्भात राम मंदिराचे प्रमुख पुजारी आचार्य सत्येंद्र दास म्हणाले, २२ जानेवारीला राम मंदिराच्या लोकार्पणासाठी फक्त रामाच्या भक्तांना निमंत्रण देण्यात आले आहे. या वक्तव्याने वादात भर पडण्याची शक्यता आहे.

जे रामाचे भक्त आहे त्यांनाच निमंत्रण देण्यात आले आहे. भाजप राम मंदिराच्या नावावर राजकारण करत आहे, असे म्हणणे अत्यंच चुकीचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सर्वत्र आदर होत आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळात मोठं काम करुन दाखवले आहे.

हे काही राजकारण नाही, ही भक्ती आहे, असे दास म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराच्या मुद्यावरुन भाजपवर निशाणा साधला होता. भाजप राम मंदिरावरुन राजकारण करत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाचे उदात्तीकरण केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

आचार्य सत्येंद्र दास यांनी खा. संजय राऊत यांच्यावरही टीका केली. राऊत म्हणतात की प्रभु राम देखील भाजपकडून निवडणूक लढतील. राम मंदिराच्या मुद्यावरुन भाजप राजकीय पोळी भाजत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप राम यांचा वापर करत आहे, अशी टीका राऊत यांनी केली होती.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

धक्कादायक! प्रियकराच्या घराबाहेर तृतीयपंथीयाची आत्महत्या

पुणे । नगर सहयाद्री:- पुण्यातील तृतीयपंथीयाला जयपूरचा तरूण आवडला. दोघांमधले प्रेम बहरले. ते दोघेही...

नैतिकता : धनुभाऊंना नाहीच; अजितदादा तुम्हाला? धनंजय मुंडेंना किती दिवस पोसणार?, चमच्यांमुळेच बीडची वाट लागली!

खंडणीखोर मुकादम, बेभान कार्यकर्ते, सत्तेचा माज असणारे नेते अन्‌‍ टुकार चमच्यांमुळेच बीडची वाट लागली!सारिपाट...

ट्रक दरीत कोसळून 10 जण ठार; कुठे घडला भयंकर अपघात!

नवी दिल्ली | नगर सह्याद्री:- कर्नाटकमध्ये बुधवारी सकाळी एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथे एक...

महाराष्ट्राच्या हाती मोठं घबाड! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दौऱ्यात काय-काय घडलं?

मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतल्या अनेक कंपन्यांच्या भेटी; सव्वासहा लाख कोटींवर गुंतवणूक करार मुंबई | नगर...