spot_img
ब्रेकिंगPolitics News:...तर ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरले असते!! 'बड्या' नेत्याचे 'मोठे' वक्तव्य

Politics News:…तर ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरले असते!! ‘बड्या’ नेत्याचे ‘मोठे’ वक्तव्य

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री-
विधानसभा अध्यक्षांनी कायद्याच्या चौकटीत राहून निर्णय दिला. सर्व न्यायलयीन प्रक्रिया पार पाडून निकाल देण्यात आला आहे. तसेच ठाकरे गटाने केलीले १६ आमदार अपात्रतेची मागणी विधानसभा अध्यक्षांनी फेटाळली. ही मॅचफिक्सिंग असती तर ठाकरे गटाचे १४ आमदार अपात्र ठरले असते, असे मत राज्याचे मंत्री शंभुराज देसाई यांनी व्यक्त केले.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या केस निकाली काढल्या. दोन्ही गटाचे आमदार पात्र ठरले; मात्र खरी शिवसेना म्हणून एकनाथ शिंदे यांच्या गटाला मान्यता देण्यात आली. तसेच भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून निवड वैध ठरवली. या निकालवर ठाकरे गटाने आक्षेप घेत सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय दिला आहे. यावर बोलताना मंत्री देसाई म्हणाले, १६ आमदारांच्या अपात्रतेची मागणी कशी चुकीची, हे अध्यक्षांनी सांगितले.

आम्ही ५४ पैकी ४० आमदार शिंदेंसोबत, आम्ही शिवसेना सोडलेली नाही, दुसर्‍या गटात गेलो नाही. आम्ही नैसर्गिक युतीत निवडून आलो असताना उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेमुळे ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवली त्यांच्यासोबत इच्छे विरोधात सरकारमध्ये सहभागी झालो. सरकार स्थापन करताना २ ते ३ हॉटेलमध्ये आम्हाला ठेवले. त्यावेळी पक्ष प्रमुखांकडे भाजप शिवसेनेचे सरकार असले पाहिजे हे आम्ही वारंवार म्हणत होतो.

विश्वप्रवक्ते ज्या मॅच फिसिंगचा आरोप करत आहेत ते निकाल येईपर्यंत विश्वास ठेवून होते. निकाल आल्यानंतर त्यांचा विश्वास उडाला. जर मॅचफिसिंग असती तर १४ आमदारही अपात्र ठरवले गेले असते. ठाकरे गटाने न्यायालयात जावे. शरद पवार यांनी त्यांना बुस्टर डोस दिला आहे. मात्र आम्ही देखील न्यायालयात आमची बाजू मांडू.

हक्कभंग आणणार…

बुधवारी निकाल जाहीर झाल्यानंतर संजय राऊत व आदित्य ठाकरे यांनी असंसदीय भाषेत वक्तव्य केले आहे. त्यांच्या विरोधात हक्क भंग आणायला हवा. याबाबत आमची प्रक्रिया सुरू झाली आहे, असेही मंत्री शंभुराज देसाई म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

खासदार निलेश लंकेंना सुजित झावरे यांचा धक्का ; विश्वासू सहकारीच लावला गळाला

ढवळपुरी गटात राजकारण फिरणार पारनेर/ नगर सह्याद्री : सुजित झावरे पाटील यांनी दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ...

सेनापतींच्या विचारांची देशाची गरज : कवी इंद्रजीत भालेराव

  सेनापती बापट साहित्य संमेलनास सुरुवात सुनील चोभे / नगर सह्याद्री - सध्याच्या काळात एकूण राजकारणात आणि...

दिवसाढवळ्या महिलेचे ‘जेसीबी’ने पाडले घर तर तहसिलच्या आवारातून डंपर चोरणारे जेरबंद; वाचा अहिल्यानगर क्राईम..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- निंबोडी शिवारात एका महिला गृहिणीच्या घरावर दिवसाढवळ्या ‘जेसीबी’ फिरवल्याची घटना...

आरक्षित कोटा ठरला, आरक्षण सोडतीकडे लक्ष

34 जागांवर महिला आरक्षण | 18 जागांवर ओबीसींना संधी | 11 नोव्हेंबर रोजी सोडत अहिल्यानगर...