spot_img
अहमदनगरधक्कादायक! शाळेत गेला पण परतलाच नाही, केडगावमधून शाळकरी मुलाचे अपहरण

धक्कादायक! शाळेत गेला पण परतलाच नाही, केडगावमधून शाळकरी मुलाचे अपहरण

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री
केडगाव येथून इयत्ता नववी मध्ये शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यास पळवले. याबाबत मुलाच्या आईने कोतवाली पोलिसांत फिर्याद दिली आहे. उदयनराजे राजू क्षेत्रे (वय १५ वर्षे) असे त्या मुलाचे नाव असून प्रतिभा राजू क्षेत्रे (वय ३५ वर्षे, रा. एकनाथनगर, केडगाव) असे फिर्याद दाखल केलेल्या आईचे नाव आहे.

फिर्यादीत महिलेने म्हटले आहे की, माझा मुलगा केडगावमधील एका शाळेत शिक्षण घेत आहे. २१ मार्चला तो सकाळी शाळेत गेला. नंतर शाळासुटल्यावर मी माझा मुलगा उदयनराजे क्षेत्रे याला घेण्यासाठी गेले असता मी शाळेच्या गेटजवळ त्याची वाट पाहत होते.

पण तो शाळेतुन बाहेर न आल्यामुळे वर्गशिक्षकांकडे विचारपूस केली.त्यांनी सांगितले की उदयनराजे हा आज शाळेत आलाच नाही. त्यानंतर परिसरात शोध घेतला, मित्रांकडे विचारणा केली तरी तो मिळाला नाही असे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास कोतवाली पोलीस करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘नीट’ परीक्षेत कमी गुण मिळाल्याने मुख्याध्यापकाने घेतला लेकीचा जीव, कुठली घटना पहा

सांगली / नगर सह्याद्री : सांगली जिल्ह्यात ‘नीट’च्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे १६ वर्षीय...

‘जिजाऊ ब्रिगेड’चा हुंडाबळी रोखण्याचा संकल्प, पहा सविस्तर

महाराष्ट्र जिजाऊ ब्रिगेडच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आढावा बैठक अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगर येथे जिजाऊ ब्रिगेड...

“युद्ध तुम्ही सुरू केलं, पण आता… ; इराणचा अमेरिकेला कडक इशारा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या इराण-इस्रायल लष्करी संघर्षात काल...

साईभक्तांसाठी आनंदाची बातमी: आता वेळ वाचणार, संस्थानकडून नवा निर्णय

शिर्डी / नगर सह्याद्री - साई संस्थानच्या या निर्णयामुळे सामान्य साईभक्तांना मोठा दिलासा मिळणार...