spot_img
महाराष्ट्रPolitical News : 'वंचित' महाविकास आघाडीत सामील ! लोकसभेसाठी 'या' सहा जागा...

Political News : ‘वंचित’ महाविकास आघाडीत सामील ! लोकसभेसाठी ‘या’ सहा जागा लढवणार?

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी आता कंबर कसली आहे. महाविकास आघाडीमध्ये आता वंचित बहुजन आघाडीचा समावेश झाला आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट, काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी यांचा महाविकास आघाडीत समावेश झाला आहे. आता त्यांच्यात जागावाटप कसे होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान आता वंचित बहुजन आघाडी सहा जागेंवर लढण्यास इच्छुक असल्याची माहिती समजली आहे.

जागावाटपाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीची तिसरी बैठक आज मुंबईत पार पडली. विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश झाल्यानंतर आज पहिल्यांदाच वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर हे मविआच्या बैठकीला उपस्थित राहिले. वंचित बहुजन आघाडीच्या समावेशाने मविआला बळकटी मिळणार आहे.

वंचित बहुजन आघाडीकडून मविआला अकोला, अमरावती, सोलापूर, दक्षिण मध्य मुंबई, परभणी या पाच जागांचा प्रस्ताव दिला असून आणखी एक जागा (अद्याप निश्चिती नाही) यावर दावा केला आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी या सहा जागांची मागणी केल्यास काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मित्रपक्ष या प्रस्तावाला कसा प्रतिसाद देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

‘या’ जागांवर तिढा कायम
महाविकास आघाडीची ही पहिलीच एकत्रित निवडणूक आहे. ३४ जागेंवर एकमत झाले असून १४ जागांवर अजूनही निर्णय झालेला नाही. त्यामध्ये वर्धा, रामटेक, भिवंडी, हिंगोली, जालना, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य आणि शिर्डी या जागांचा समावेश असल्याचे समजते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर शहरात परीक्षेच्या तयारीसाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री अल्पवयीन मुलीशी प्रेमाचे नाटके करत, वारंवार फोटो व्हायरल करण्याची धमकी...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींच्या विजयाची सुरवात, भरघोस यश प्राप्त होणार..

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य मानसिक शांततेसाठी तुमचा तणाव दूर करा. चैतन्याने सळसळता...

पावसाळी अधिवेशन विरोधकांनी तापवलं; पहिल्याच दिवशी काय-काय घडलं?

मुंबई | नगर सह्याद्री आजपासून (दि.३० जून) राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. हे...

पंजाबराव डख यांनी दिला शेतकऱ्यांना सल्ला; निसर्गाच्या विरोधात शेती कराल तर..

पारनेर । नगर सहयाद्री:- हवामानाचा अभ्यास करून शेती करणे ही काळाची गरज आहे. मोठ्या...