spot_img
अहमदनगरपेपरला गेली अन घरी आलीच नाही! बारावीच्या मुलीसोबत नेमकं घडलं काय?

पेपरला गेली अन घरी आलीच नाही! बारावीच्या मुलीसोबत नेमकं घडलं काय?

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री-
बारावीचे पेपर देण्यासाठी गेलेली मुलगी घरी परत आली नाही. नातेवाईक, मैत्रिणीकडे शोध घेतला असता ती मिळून न आल्याने तिच्या वडिलांनी सोमवारी (दि. २६) दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी नगर तालुयातील एका गावात राहतात. त्यांची मुलगी नगर शहरातील एका विद्यालयात बारावीच्या वर्गात शिक्षण घेते. सध्या तिचे बारावीचे पेपर सुरू आहे. ती शुक्रवारी (दि. २३) घरून पेपर देण्यासाठी विद्यालयात आली होती. दरम्यान पेपरला दोन दिवस सुट्टी असल्याने मैत्रिणीकडे वसतिगृहात अभ्यास करण्यासाठी थांबले असल्याचे तिने फिर्यादीला सांगितले.

दरम्यान सोमवारी होणार्‍या पेपरसाठी ती आली नाही. नातेवाईक, मैत्रिणीकडे चौकशी केली असता ती मिळून आली नाही. तिच्याकडील मोबाईल बंद येत असल्याने फिर्यादी यांनी तोफखाना पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून मुलीचा शोध सुरू केला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ईश्वरी तुपे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम

  अहिल्यानगर / नगर सह्याद्री - अहिल्यानगर जिल्हा परिषद आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक...

शांताराम लंके यांचे सामाजिक कार्य मोठे : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे

निघोज / नगर सह्याद्री : कन्हैया दूध उद्योग समूहाचे सर्वेसर्वा शांताराम लंके यांचे सामाजिक कार्य...

दगाफटका केल्यास सरकारचा कार्यक्रमच लावणार; जरांगे पाटील काय म्हणाले पहा…

बीड / नगर सह्याद्री - मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राज्यातील वातावरण चांगलंच...

शेअर ट्रेडिंगमध्ये अधिक नफा मिळवून देण्याच्या आमिषाने ५० लाखांची ऑनलाईन फसवणूक

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून...