spot_img
अहमदनगरपेपरला गेली अन घरी आलीच नाही! बारावीच्या मुलीसोबत नेमकं घडलं काय?

पेपरला गेली अन घरी आलीच नाही! बारावीच्या मुलीसोबत नेमकं घडलं काय?

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री-
बारावीचे पेपर देण्यासाठी गेलेली मुलगी घरी परत आली नाही. नातेवाईक, मैत्रिणीकडे शोध घेतला असता ती मिळून न आल्याने तिच्या वडिलांनी सोमवारी (दि. २६) दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी नगर तालुयातील एका गावात राहतात. त्यांची मुलगी नगर शहरातील एका विद्यालयात बारावीच्या वर्गात शिक्षण घेते. सध्या तिचे बारावीचे पेपर सुरू आहे. ती शुक्रवारी (दि. २३) घरून पेपर देण्यासाठी विद्यालयात आली होती. दरम्यान पेपरला दोन दिवस सुट्टी असल्याने मैत्रिणीकडे वसतिगृहात अभ्यास करण्यासाठी थांबले असल्याचे तिने फिर्यादीला सांगितले.

दरम्यान सोमवारी होणार्‍या पेपरसाठी ती आली नाही. नातेवाईक, मैत्रिणीकडे चौकशी केली असता ती मिळून आली नाही. तिच्याकडील मोबाईल बंद येत असल्याने फिर्यादी यांनी तोफखाना पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून मुलीचा शोध सुरू केला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरमध्ये ग्राम महसुल अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात

  अहिल्यानगर/प्रतिनिधी : पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण (ता. नगर) येथील ग्राम महसुल अधिकारी दिपक साठे यास लाचलुचपत...

आता मराठ्यांचं वादळं दिल्लीत धडकणार, जरांगे पाटलांची थेट घोषणा, समोर आलं मोठं कारण

नगर सह्याद्री वेब टीम - मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज...

प्रवाशांनो लक्ष द्या! आता बीडहून अहिल्यानगरकडे रेल्वेगाडी धावणार; कुणाच्या हस्ते झाले उदघाटन?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अनेक दशकांपासून बीडवासीयांचे स्वप्न असलेली रेल्वे अखेर वास्तवात उतरली आहे....

आमदारांची ॲक्शन, पोलिसांची रिॲक्शन; रस्त्यावर गोमांस फेकणाऱ्या आरोपीला सहा तासात बेड्या

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरातील कोठला भागात मंगळवारी सायंकाळी रस्त्यावर गोमांस टाकल्याचे निदर्शनास आल्यावर...