spot_img
ब्रेकिंगपारनेर: ..हा तर बेकायदेशीर लिलाव? नगरपंचायतीचा 'असा' कारभार

पारनेर: ..हा तर बेकायदेशीर लिलाव? नगरपंचायतीचा ‘असा’ कारभार

spot_img

शरद झावरे । नगर सहयाद्री-

दरवर्षी दिवाळी निमित्त पारनेरमध्ये लोणी रोडवरील शासकीय जागेवर फटाका बाजार उभारला जातो. परंतु यावर्षी पारनेर नगरपंचायतीने या गाळ्यांचा लिलाव करून लाखो रुपयांची कमाई केली. त्यामुळे पारनेर शहरासह परिसरातील फटका व्यापार्‍यांमध्ये तीव्र नाराजी आणि संताप आहे. हा लिलाव बेकायदेशीर असल्याचा आरोप होत आहे.

पारनेर शहरातील गट नंबर १३ मध्ये दरवर्षी फटाका बाजार उभारण्यासाठी दहा १० बाय १० गाळे तीन हजार रुपये भरून आठ दिवसांसाठी भाडेतत्त्वावर दिले जात होते. परंतु यावर्षी या २२ गाळ्यांचा लिलाव पारनेर नगरपंचायतीने केला असून ४० हजारांपासून ते ४ हजारपर्यंत या २२ गाळ्यांचा लिलाव गुरुवारी करण्यात आला.

पारनेर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष, नगरसेवक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत हा लिलाव झाला. या लिलावाची चौकशी करण्याची मागणी फटाका व्यापार्‍यांनी केली आहे.

पारनेर-लोणी रोडवर असणार्‍या शासकीय जागा यासंदर्भात न्यायालयीन वाद चालू आहे. परंतु पारनेर नगरपंचायतीने फटाका बाजारच्या नावखाली लाखो रुपयांची कमाई या लिलावातून केली. या संदर्भात कोणत्याही वर्तमानपत्रात माहिती दिली नाही अथवा सूचना फलक किंवा सोशल मीडियावर जाहिरात प्रसिद्ध केली नाही.

दुसरीकडे ज्या फटका व्यापार्‍यांनी जीएसटी बिले सादर केली, त्यांनाच फटाका बाजारमध्ये गाळे देण्यात आले आहे.अनेक होतकरू व गरजू मुले दिवाळीच्या काळात फटाका स्टॉल लावून शिक्षण व कुटुंबासाठी पैसे कमावतात. पारनेर नगर पंचायतीने बोली लिलाव करून या तरुणांवर अन्याय केल्याची भावना व्यक्त होत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर! महत्वाचे कारण आले समोर, वाचा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था -  मागील चार ते पाच वर्षांपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या...

आधी पाप केलं, आता सल्ले देऊ नका!, निवृत्ती घ्या!; शरद पवार यांच्या टीकेला मंत्री विखे पाटलांचे प्रतिउत्तर

नाशिक । नगर सहयाद्री राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या वतीने नाशिक येथे भव्य शेतकरी...

बाजारात पोहचण्याआधीच संकट; पिकअपच्या अपघाताने हादरले ‘अहिल्यानगर’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील आठवडे बाजारासाठी जात असताना सोमवारी (१५ सप्टेंबर) दुपारी साडेतीन...

दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना खुशखबर! सरकारचा मोठा निर्णय?, समोर आली अपडेट

मुंबई ।नगर सहयाद्री:- भारत हा कृषीप्रधान देश असून कोट्यवधी शेतकरी आपल्या उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहेत....