spot_img
अहमदनगरबापरे! श्री साई समर्थ एग्रो एजन्सीला भीषण आग; आगीत ७० ते ८०...

बापरे! श्री साई समर्थ एग्रो एजन्सीला भीषण आग; आगीत ७० ते ८० लाखांचे…

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री –
नगर बाजार समिती परिसरातील नगर तालुका खरेदी विक्री संघाच्या इमारतीतील श्री साई समर्थ एग्रो एजन्सीला आग लागून ७० ते ८० लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना १४ नोव्हेंबर रोजी पहाटे घडली. या प्रकरणी तत्काळ आग आटोयात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले. सुदैवाने या घटनेत कुठल्याही प्रकारची जिवितहानी झाली नाही. आग त्वरित आटोयात आणल्याने पुढील मोठा अनर्थ टळला. ऐन दिवाळीच्या सणासुदीत ही घटना घडल्याने व्यापारी वर्गात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. जिल्हा परिषदेचे सदस्य संदेश कार्ले यांचे बंधू दौलत कार्ले यांचे हे दुकान आहे.

कार्ले नेहमीप्रमाणे सोमवारी (दि. १३) रात्री दुकान बंद करून खंडाळा या गावी गेले. मंगळवारी दिवाळी पाडवा सण होता. या सणाच्या दिवशीच श्री साई  समर्थ एग्रो एजन्सी या दुकानाला पहाटे आग लागली. ही आग शॉर्ट सर्किटने लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मंगळवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. अतुल कराळे यांनी ही बाब श्री साई समर्थ एजन्सीतील तील बबन बोरुडे यांच्या निदर्शनास आणून दिली.

बोरुडे यांनी तत्काळ कार्ले कुटूंबियांना याबाबतची माहिती दिली. परंतु, जि.प. सदस्य संदेश कार्ले व त्यांचे बंधू दौलत कार्ले हे बुलढाणा येथील साकी येथे एका धार्मिक कार्यक्रमासाठी गेले होते. कार्ले बंधू प्रविण कार्ले व त्यांच्या मित्र मंडळींनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान बोरुडे यांनी अग्निशमक दलाला घटनेची माहिती कळवली.

अग्निशमन दल एका बंबासह त्वरित घटनास्थळी दाखल झाले. अवघ्या अर्ध्या तासातच आग आटोयात आणण्यात यश आले. आगीत विविध प्रकारच्या कंपनीची औषधे, बी बियाणे आदी वस्तू जळून खाक झाल्या. सुमारे ७० ते ८० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज संचालिका शीतल प्रविण कार्ले यांनी व्यक्त केला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

धक्कादायक प्रकार: पारनेर सहकारी साखर कारखान्यातून150 कोटींचा मुद्देमाल गायब

चौकशीतून माहिती उजेडात । बचाव समितीकडून जप्तीची मागणी पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर सहकारी साखर...

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? तटकरेंनी स्पष्टचं सांगितलं, नेमकं पडद्याआड काय सुरू आहे?

मुंबई / नगर सह्याद्री : ५ जुलै २०२५ या दिवशी महाराष्ट्राच्या राजकारण एक मोठी घडामोड...

स्वच्छ सर्वेक्षणाचा पुरस्कार मनपाने विकत आणला काय?; किरण काळेंनी केली पोलखोल

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहर कचरामय झाल आहे. घंटागाड्या गायब आहेत. जागोजागी कचऱ्यांचे ढीग...

सुनेच्या नावे केलेली जमीन परत सासू-सासऱ्यांच्या नावे; न्यायाधिकरणाचा महत्वपूर्ण आदेश, काय आहे प्रकरण पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री : आई - वडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण प्राधिकरणाचे...