spot_img
महाराष्ट्रआज ओबीसींची भव्य सभा ! भुजबळांसह पडळकरांपर्यंत कोण काय बोललं? पहा..

आज ओबीसींची भव्य सभा ! भुजबळांसह पडळकरांपर्यंत कोण काय बोललं? पहा..

spot_img

जालना / नगर सहयाद्री : राज्यात आरक्षणाचा मुद्दा चांगलंच तापला आहे. मराठा आरक्षणासाठी एकीकडे रान पेटलेले असताना आज ओबीसी आरक्षण बचावासाठी राज्यातील सर्व पक्षीय ओबीसी नेते एकत्र आले. त्यांनी जालन्यातील अंबड येथे सभा घेतली.

यावेळी विविध नेत्यांनी राजकीय वक्तव्य केली. यावेळी बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी फडणवीस सरकारने मराठा आरक्षण कायदा मांडला त्यावेळी हात वर करून मत दिल होत असं सांगितलं. तसेच मराठा समाजच्या आरक्षणासाठी आमचा विरोध नाही असं ते म्हणाले. यावेळी भाजप नेते गोपीचंद पडळकर देखील आक्रमक झाले होते.

ओबीसीच्या मूळावर उठणाऱ्यांविरोधात एकजूट दाखवा. मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे. ओबीसींनी एकजूट कायम ठेवावी अशी मागणी भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी केली. माळी, धनगर, वंजारी समाज म्हणजे माधवला एकत्र केल तर महाराष्ट्र जिंकल्याशिवाय राहणार नाही. ओबीसी नेत्यावर कोणी बोट दाखवले तर आम्ही हात दाखवल्याशिवाय राहणार नाही,

आजपासून घोषणा द्या, एक ओबीसी, एक कोटी ओबीसी ! इथून पुढे महाराष्ट्रात ओबीसी आंदोलनचा वणवा पेटवायचा आहे असे वक्तव्य भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी जालना मेळाव्यात केले आहे.

दरम्यान जालना येथील ओबीसीच्या एल्गार मेळाव्याला पंकजा मुंडे अनुपस्थित राहिल्या. व्यासपीठावर मात्र त्यांची छायाचित्रे लावण्यात आली होती. लोकनेते गोपीनाथ मुने यांचे फोटोही यावेळी लक्ष वेधून घेत होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहमदनगर ब्रेकिंग ! गामा भागानगरे खून प्रकरणातील फरार आरोपीवर हल्ला, माळीवाड्यात पोलिसांचा फौजफाटा

अहमदनगर / नगर सह्याद्री : अहमदनगरच्या बालिकाश्रम रोड परिसरात काही दिवसांपूर्वी ओंकार उर्फ...

Ahmednagar: शहरासह जिल्ह्यात जोर ‘धार’

रस्त्यांवर अर्धाफुट पाणी; नगरकरांची अक्षरश: त्रेधातिरपीट अहमदनगर | नगर सह्याद्री मागील रविवारपासून अवकाळीचा तडाखा जिल्ह्याला बसत...

Ahmednagar: पत्र आले आमदारांचे, ‘माफी’ सूचली प्रशासनाला

शास्तीच्या रकमेत सवलत देण्याची परंपरा कायम ः आता प्रतिसादाकडे लक्ष अहमदनगर | नगर सह्याद्री आमदारांनी पत्र...

Parner: खासदार विखे शेतकऱ्यांच्या बांधावर! म्हणाले, शेतकऱ्यांना..

पारनेर। नगर सह्याद्री- तालुक्यातील महसूल व कृषी कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांना पिकांचे पंचनामे करताना कोणत्याही अडचणी येऊ...