spot_img
अहमदनगरझोपड्यांमध्ये लावलेला दिवा भावी पिढीला दिशा देणारा ठरेल ; रसिक ग्रुपच्या वतीने...

झोपड्यांमध्ये लावलेला दिवा भावी पिढीला दिशा देणारा ठरेल ; रसिक ग्रुपच्या वतीने झोपड्यांमध्ये दीपोत्सव साजरा

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री –
दिवाळी सणाच्या पूर्वसंध्येला आमदार संग्राम जगताप यांनी शहरातील प्रेमदान हडको जवळील गरीब, वंचीत कुटुंबातील झोपड्यांमध्ये जाऊन पणती पेटवून प्रकाशित केली, आणि झोपडीच्या दाराला स्वतःच्या हाताने तोरण बांधून गरीब कुटूंबासोबत उपस्थित मान्यवर व रसिक ग्रुप सोबत एकत्र येतं दिवाळीचा आनंदोत्सव साजरा केला. पणतीच्या प्रकाशाप्रमाणे प्रत्येक कुटुंबात सुख शांती तेवत राहावी. गरीब कुटुंबातील झोपड्यांमध्ये लावलेला दिवा हा केवळ दिवाळीसाठी लावला नाही तर या कुटुंबातील भावी पिढीला भविष्यात उज्वल दिशा देण्यासाठी लावण्यात आला आहे. ज्या नागरीकांचे हातावर पोट आहे अशांची दिवसभर कष्ट करून आपली दिनचर्या सुरु राहते त्यांना देखील दिवाळी सण उत्साहात साजरा करता यावा यासाठी रसिक ग्रुपने सामाजिक भावनेतून राबवलेला उपक्रम कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

रसिक ग्रुपच्या वतीने दिवाळीच्या पूर्वसंध्येला प्रेमदान हडको येथील गरीब कुटुंबातील झोपड्यांमध्ये दीपोत्सव साजरा करण्यात आला.  यावेळी रसिक ग्रुप अध्यक्ष जयंत येलूलकर, उद्योजक के के शेट्टी, प्रदीप पंजाबी, सुरेश चव्हाण, राजेंद्र उदागे, सुनील गोसावी, नंदकुमार आढाव, चंद्रकांत पालवे, दशरथ खोसे, ऋषिकेश येलूलकर, दीपाली देऊतकर, स्नेहल उपाध्ये, तेजा पाठक, डॉ. ज्योती चोपडे, बाळकृष्ण गोटीपामुल, कर्डिले डेकोरेटर्स चे संजय कर्डिले, विठठल शिंदे, अशोक जोशी, महावीर गुगळे, प्रसन्न एखे, निखिल डफळ, विनायक मुत्याल, शामा मंडलिक, स्वाती अहिरे, सुनिल महाजन, गणेश गोंडाळ, सरोज आल्हाट यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी रसिक ग्रुप अध्यक्ष जयंत येलूलकर म्हणाले की, सर्व मित्र परिवाराने एकत्र येऊन रसिक ग्रुपच्या माध्यमातून गरीब कुटुंबाची दिवाळी गोड व आनंदात साजरी व्हावी यासाठी साडी, दिवाळी फराळ, फटाके, मिठाई, पणती, तोरण आदी वस्तू भेट देण्यात आल्या आहे. तसेच शहरातील अशाच गरीब कुटुंबापर्यंत पोहचून त्यांना देखील दिवाळी निमित्त रसिक ग्रुपच्या वतीने भेट वस्तू देण्यात येणार आहे. या कुटुंबांच्या चेहर्‍यावरील आनंद हीच खरी सुखाची भावना असते, असे त्यांनी सांगितले.

यावेळी श्रीनिवास बोज्जा यांच्या वतीने बाळगोपाळांना फटाके देण्यात आले. या गरीब कुटुंबातील सदस्यांच्या समवेत दिवाळी साजरी करण्याचे समाधान ही मानवतेची पुजा असते. असेही येलुलकर म्हणाले तेजा पाठक यांनी स्वागत केले तर दीपाली देऊतकर यांनी आभार मानले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सिस्पे विरोधात ठेवीदार आक्रमक; पाच दिवसात पैसे जमा न झाल्यास…, काय दिलाय इशारा पहा

  पारनेर / नगर सह्याद्री- पारनेर, सुपा परिसरातील सुमारे चारशे कोटी रूपयांना गंडा घालणाऱ्या 'सिस्पे कंपनी'...

नगरसेवकाची आरोग्य अधिकाऱ्यास दमबाजी; मनपा कर्मचाऱ्यांनी घेतला मोठा निर्णय

मनपा अधिकारी, कर्मचाऱ्यांना दमदाटी, शिवीगाळ करण्याचे प्रकार वाढले असून संबंधितांवर कारवाई करावी - सचिव...

कामात अडथळा, जीव मारणे प्रकरणी नगरसेवक कोतकर, बोराटेंवर एफआयआर, काय घडलं पहा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सतीश बाबूराव राजुरकर यांच्या तक्रारीवरून नगरसेवक...

आमदार माजलेत….; विधानसभेत फडणवीस संतापले, काय घडलं जाणून घ्या

मुंबई / नगर सह्याद्री - विधानभवनात गुरुवारी झालेल्या गोंधळामुळे संपूर्ण विधिमंडळाच्या प्रतिष्ठेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं...