spot_img
देशबोगदा दुर्घटनेत १६ दिवसांपासून अडकलेत मजूर ! बाबा बोखनाग हे नाराज झाल्यामुळे...

बोगदा दुर्घटनेत १६ दिवसांपासून अडकलेत मजूर ! बाबा बोखनाग हे नाराज झाल्यामुळे असं झालय? ग्रामस्थांनी काय दावा केलाय पहा

spot_img

नगर सहयाद्री टीम :
Baba Bokhnag devta : उत्तरकाशीतील सिलक्यारा बोगदा दुर्घटननेत जवळपास सोळावा दिवसापासून मजूर अडकले आहेत. सोळा दिवस उलटूनही त्यांना बाहेर काढण्यात यश येत नाही. अनेक अडथळे या रेस्क्यू मध्ये येत आहेत.

परंतु हे सर्व बोगदा तयार केला जात असल्याने बाबा नाराज झाले आहेत आणि यामुळेच रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी होण्यात अडथळा येत आहे, असा दावा ग्रामस्थ करतायेत. बौखनाग देवता नाराज झाले असल्याने, बोगद्यात अडकलेल्या मजुरांच्या रेस्क्यूत वारंवार अडथळे येत आहेत.

एवढेच नाही तर, जोवर बाबा बौखनाग यांचे पक्के मंदीर बांधले जाणार नाही आणि त्यांची विधीवत पद्धतीने पूजा-अर्चा होणार नाही, तोवर रेस्क्यू होऊ शकणार नाही असाही दावा ग्रामस्थ करत आहेत.

बाबा बौखनाग देवतेविषयी –
उत्तरकाशीच्या रेडिटॉप भागात बाबा बोखनाग यांचे मंदिर असून ते परिसराचे संरक्षक मानले जातात. पहाडी भागात असलेल्या त्यांच्या मंदिरात परिसरात दरवर्षी यात्रा भरते.

लोकांना खूप आस्था आहे. येथील प्रत्येक गावात बाबांचे मंदिर असून संपूर्ण परिसराचे संरक्षण तेच करतात व त्यांचे दर्शन घेतल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात, असे मानले जाते. ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, बाबा बौखनाग यांची उत्पत्ती सापाच्या रूपात झाली आहे.

मानले जाते की, भगवान श्रीकृष्ण टिहरी येथील सेममुखेम येथून येथे आले होते. यामुळे सेममुखेम आणि बाबा बोखनाग यांच्या मंदिरात दरवर्षी यात्रा भरते. हे मंदिर ज्या ठिकाणी उभे आहे, त्याच्या बरोबर खालूनच बोगदा जात आहे. अशात, त्यांच्या शेपटीखालून बोगदा जाणे हितकारक असू शकत नाही असं ग्रामस्थांनी म्हटलं आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...