spot_img
देशबोगदा दुर्घटनेत १६ दिवसांपासून अडकलेत मजूर ! बाबा बोखनाग हे नाराज झाल्यामुळे...

बोगदा दुर्घटनेत १६ दिवसांपासून अडकलेत मजूर ! बाबा बोखनाग हे नाराज झाल्यामुळे असं झालय? ग्रामस्थांनी काय दावा केलाय पहा

spot_img

नगर सहयाद्री टीम :
Baba Bokhnag devta : उत्तरकाशीतील सिलक्यारा बोगदा दुर्घटननेत जवळपास सोळावा दिवसापासून मजूर अडकले आहेत. सोळा दिवस उलटूनही त्यांना बाहेर काढण्यात यश येत नाही. अनेक अडथळे या रेस्क्यू मध्ये येत आहेत.

परंतु हे सर्व बोगदा तयार केला जात असल्याने बाबा नाराज झाले आहेत आणि यामुळेच रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी होण्यात अडथळा येत आहे, असा दावा ग्रामस्थ करतायेत. बौखनाग देवता नाराज झाले असल्याने, बोगद्यात अडकलेल्या मजुरांच्या रेस्क्यूत वारंवार अडथळे येत आहेत.

एवढेच नाही तर, जोवर बाबा बौखनाग यांचे पक्के मंदीर बांधले जाणार नाही आणि त्यांची विधीवत पद्धतीने पूजा-अर्चा होणार नाही, तोवर रेस्क्यू होऊ शकणार नाही असाही दावा ग्रामस्थ करत आहेत.

बाबा बौखनाग देवतेविषयी –
उत्तरकाशीच्या रेडिटॉप भागात बाबा बोखनाग यांचे मंदिर असून ते परिसराचे संरक्षक मानले जातात. पहाडी भागात असलेल्या त्यांच्या मंदिरात परिसरात दरवर्षी यात्रा भरते.

लोकांना खूप आस्था आहे. येथील प्रत्येक गावात बाबांचे मंदिर असून संपूर्ण परिसराचे संरक्षण तेच करतात व त्यांचे दर्शन घेतल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात, असे मानले जाते. ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, बाबा बौखनाग यांची उत्पत्ती सापाच्या रूपात झाली आहे.

मानले जाते की, भगवान श्रीकृष्ण टिहरी येथील सेममुखेम येथून येथे आले होते. यामुळे सेममुखेम आणि बाबा बोखनाग यांच्या मंदिरात दरवर्षी यात्रा भरते. हे मंदिर ज्या ठिकाणी उभे आहे, त्याच्या बरोबर खालूनच बोगदा जात आहे. अशात, त्यांच्या शेपटीखालून बोगदा जाणे हितकारक असू शकत नाही असं ग्रामस्थांनी म्हटलं आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राखेतून फिनिक्ससारखी भरारी — माजी सैनिक नवनाथ खामकर यांचा संकल्प एस. मार्ट पुन्हा उभा

  श्रीगोंदा / नगर सह्याद्री - राखेतून पुन्हा जन्म घेणाऱ्या फिनिक्स पक्षासारखी किमया श्रीगोंद्यात पाहायला मिळाली...

स्थानिक स्वराज्य संस्थांनच्या निवडणुका संभाजी ब्रिगेड ताकदीने लढवणार – इंजी. शामभाऊ जरे

श्रीगोंदा / नगर सह्याद्री दिवाळीनंतर होणाऱ्या नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी संभाजी ब्रिगेड...

ओबीसी आरक्षण कमी झाल्याचा पुरावा आहे का? राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणाले पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - ओबीसी आरक्षणावरून शुक्रवारपासून वातावरण पुन्हा तापले आहे. बीडमध्ये ओबीसी...

अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना 846 कोटी 96 लाख रुपयांची मदत; पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

अहिल्यानगर | नगर सह्याद्री सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर...