spot_img
ब्रेकिंगमहायुतीचं ठरलं! किती जागा लढवणार? बैठकीत उमेदवारांच्या नावांवर एकमत

महायुतीचं ठरलं! किती जागा लढवणार? बैठकीत उमेदवारांच्या नावांवर एकमत

spot_img

मुंबई | नगर सह्याद्री:-
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूव महायुतीमध्ये जागांवर मंथन सुरू आहे. भाजप महाराष्ट्रात 150 ते 160 जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत उमेदवारांच्या नावांवर जवळपास एकमत झाले आहे. आता भाजपच्या केंद्रीय संसदीय मंडळाच्या बैठकीत यावर चर्चा होऊन त्याला अंतिम मंजुरी दिली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

महाराष्ट्र भाजप नेते आज दिल्लीत केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करणार आहेत. यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दिल्लीला रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री शिंदेही संध्याकाळी उशिरा दिल्लीला रवाना होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागा आहेत. भाजप एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करून निवडणूक लढवत आहे. अशा स्थितीत भाजप या आघाडीत जास्तीत जास्त जागा लढवणार असल्याचे मानले जात आहे. शिवसेना 100 पेक्षा जास्त तर राष्ट्रवादी 60 पेक्षा जास्त जागांची महायुतीत मागणी करत आहे. शिवसेनेला 90 ते 95 तर राष्ट्रवादीला 40 ते 45 जागा मिळू शकतात, असे मानले जात आहे.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 162 जागांवर निवडणूक लढवली आणि 105 जागा जिंकल्या. त्यावेळी एकसंध असलेल्या शिवसेनेने 124 जागांवर उमेदवार उभे केले होते आणि त्यांना 56 जागा मिळाल्या होत्या. यावेळी समीकरणे बदलली आहेत. तर संयुक्त राष्ट्रवादी काँग्रेसने 121 जागांवर उमेदवार उभे केले होते आणि 54 जागा जिंकल्या होत्या. नंतर राष्ट्रवादीत बंडखोरी झाली आणि अजित पवारांसह बहुतांश आमदार महाआघाडीत सामील झाले. 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेससोबत आघाडी करून निवडणूक लढवली होती.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...