spot_img
ब्रेकिंगमहायुतीचं ठरलं! किती जागा लढवणार? बैठकीत उमेदवारांच्या नावांवर एकमत

महायुतीचं ठरलं! किती जागा लढवणार? बैठकीत उमेदवारांच्या नावांवर एकमत

spot_img

मुंबई | नगर सह्याद्री:-
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूव महायुतीमध्ये जागांवर मंथन सुरू आहे. भाजप महाराष्ट्रात 150 ते 160 जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत उमेदवारांच्या नावांवर जवळपास एकमत झाले आहे. आता भाजपच्या केंद्रीय संसदीय मंडळाच्या बैठकीत यावर चर्चा होऊन त्याला अंतिम मंजुरी दिली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

महाराष्ट्र भाजप नेते आज दिल्लीत केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करणार आहेत. यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दिल्लीला रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री शिंदेही संध्याकाळी उशिरा दिल्लीला रवाना होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागा आहेत. भाजप एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करून निवडणूक लढवत आहे. अशा स्थितीत भाजप या आघाडीत जास्तीत जास्त जागा लढवणार असल्याचे मानले जात आहे. शिवसेना 100 पेक्षा जास्त तर राष्ट्रवादी 60 पेक्षा जास्त जागांची महायुतीत मागणी करत आहे. शिवसेनेला 90 ते 95 तर राष्ट्रवादीला 40 ते 45 जागा मिळू शकतात, असे मानले जात आहे.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 162 जागांवर निवडणूक लढवली आणि 105 जागा जिंकल्या. त्यावेळी एकसंध असलेल्या शिवसेनेने 124 जागांवर उमेदवार उभे केले होते आणि त्यांना 56 जागा मिळाल्या होत्या. यावेळी समीकरणे बदलली आहेत. तर संयुक्त राष्ट्रवादी काँग्रेसने 121 जागांवर उमेदवार उभे केले होते आणि 54 जागा जिंकल्या होत्या. नंतर राष्ट्रवादीत बंडखोरी झाली आणि अजित पवारांसह बहुतांश आमदार महाआघाडीत सामील झाले. 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेससोबत आघाडी करून निवडणूक लढवली होती.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

काँग्रेसचा नगर शहर विधानसभेवर दावा; पहिला उमेदवारी अर्ज घेतला? वाचा सविस्तर..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- विधानसभा निवडणुकीचे अर्ज मिळण्याची व भरण्याची प्रक्रिया मंगळवार (दि.२२) सकाळ पासून...

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सहा दिवसांचाच वेळ? दोन दिवस लागणार ब्रेक; कारण काय?, वाचा सविस्तर..

Maharashtra Assembly Election: महाराष्ट्राच्या १५ व्या विधानसभेसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार असून निवडणुकीचा निकाल...

अहो ताई, तालुक्याचा बाप कोण हे जनता ठरवणार; डाॅ सुजय विखे पाटलांनी साधला निशाणा..

बापाबद्दल नव्हे निष्क्रीय आमदाराबद्दल बोललो! राजकन्येला बोलण्यासाठी भाग पाडणारेच त्यांचा घात करणार पठार भागात युवकांकडून...

नगरमध्ये धक्कादायक प्रकार! आजीचा मृतदेह दिवाणमध्ये लपवून ठेवला? लालची नातवाच भाडं फुटलं..

अहिल्यानगर। नगर सहयाद्री:- ९0 वर्षीय वृद्ध आजीच्या गळ्यातील ७० हजार रुपये किमतीचे दागिने काढून घेण्यासाठी...