spot_img
अहमदनगरशेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा बँकेने घेतला मोठा निर्णय

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा बँकेने घेतला मोठा निर्णय

spot_img

पिक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या कर्जदार शेतकऱ्यांकडुन यापुढे व्याज वसुल न करण्याचा जिल्हा बँकेचा निर्णय / मुख्य कार्यकारी आधिकारी रावसाहेब वर्पे
अहमदनगर / नगर सह्याद्री –
अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने चालु वर्षात रू.२९९५ कोटीचे कर्ज वाटप केलेले असुन चालु वर्षात आज अखेर ४६७४ कोटीचे पिक वसुलास पात्र असुन ३८३३ कोटीचे येणेबाकी कर्ज आहे. शासनाने दुष्काळसदृश्य परिस्थितीमुळे शेतकऱ्यांकडून त्यांना अनुज्ञेय प्रोत्साहनपर व्याज अनुदान रक्कम वजा करून परत फेडीची रक्कम वसुल करणेबाबत दि.२७ मार्च २०२४ च्या सहकार आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांनी कळविल्यानुसार अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा चालू अथकीत वसुलास पात्र पिक कर्ज वसुलीबाबत फक्त मुद्दल कर्ज वसुल करणेबाबत निर्णय झालेला आहे. त्यानुसार याबाबत शाखांना सविस्तर सुचना कळविल्या असल्याची माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी आधिकारी रावसाहेब वर्पे यांनी दिली.

सद्यस्थितीत गतसालाच्या तुलनेत बँकेचा वसुल कमी प्रमाणात होत असुन शासनाकडुन शेतक-यांना प्रोत्साहनपर व्याज अनुदान देणे कामी योजने अंतर्गत केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्याकडून बँकेला सन २०१९-२०२० ते आजपर्यंत १७६ कोटीचे व्याज परतावा अदयापही जमा झालेला नाही तसेच महाराष्ट्र शासनाकडुन डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत परतावा योजने अंतर्गत कर्जदार शेतक-यांना देण्यात येणारे व्याज सवलत सन २०२१ पासुनची ४०१५९९ सभासदांचे ९९ कोटी ७५ लाखाचे व्याज शासनाकडुन अदयापही जमा झालेला नाही.

बँक ठेवीदाराच्या पैशातुनच सर्व प्रकारचे कर्ज वाटप करीत असल्याने व बँकेस ठेवीदारांना मात्र त्यांच्या ठेवी व ठेवीवरील व्याज नियमित द्यावे लागते. सदरच्या शासनाकडून व्याज परतावा वेळेत न आल्याने बँकेवर व प्राथ.वि.का.सेवा संस्थावर त्याचा विपरीत परिणाम होत असुन शासनाने वेळेत व्याज परतावे जमा दिल्यास बँक व वि.का.सेवा संस्थांची आर्थिक नुकसान होणार नाही याबाबत बँक शासनाकडे सतत पाठपुरावा करीत आहे अशी माहीती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांनी दिली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...