spot_img
महाराष्ट्रमोठी बातमी ! कंपनीत विषारी वायू, एकाचा मृत्यू दोन कामगार अत्यावस्थ, अहमदनगर...

मोठी बातमी ! कंपनीत विषारी वायू, एकाचा मृत्यू दोन कामगार अत्यावस्थ, अहमदनगर जवळील घटना

spot_img

बारामती / नगर सह्याद्री : कंपन्यांमधील विषारी वायूमुळे होणाऱ्या अपघातांच्या घटना काही नवीन नाहीत. आता एक मोठी बातमी आली आहे. अहमदनगर जवळील दौंड तालुक्यात ही घटना घडली आहे. येथील एका कंपनीत रासायनिक विषारी वायूमुळे एका कामगाराचा मृत्यू झाला असून दोन कामगारांची प्रकृती अत्यावस्थ आहे.

असल्याची घटना घडली आहे. दौंड तालुक्यातील भांडगाव येथे ही घटना घडली असून जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, दौंड तालुक्यातील भांडगाव येथील एका कंपनीत गुरूवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास रासायनिक ऍसिडचे ड्रम पडून आग लागल्याची घटना घडली. ही आग विझवण्यासाठी अग्निबंबाचा वापर केल्याने परिसरात विषारी वायू तयार झाला. या विषारी वायुच्या संपर्कात आल्यामुळे एका कामगाराचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, कंपनीत ऍसिड ड्रम अचानक पलटी झाल्याने कंपनीत अचानक आग लागली. ही आग विझविण्यासाठी कामगारांनी तातडीने अग्निबंबाचा वापर केला. ही आग विझवताना मोठ्या प्रमाणात विषारी धूर तयार झाला होता. हा धूर कामगारांच्या नाका तोंडात गेला होता.

घटनेदरम्यान, कामगारांना कुठल्याही प्रकारचा त्रास जाणवला नाही. मात्र संध्याकाळी कामगार घरी गेल्यानंतर 3 कामगारांना श्वसनाचा त्रास होऊ लागला. यामधील एकाचा मृत्यू झाला तर दोघांवर उपचार सुरू आहेत. अमोल चौधरी असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. तर दोन कामगार अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘नीट’ परीक्षेत कमी गुण मिळाल्याने मुख्याध्यापकाने घेतला लेकीचा जीव, कुठली घटना पहा

सांगली / नगर सह्याद्री : सांगली जिल्ह्यात ‘नीट’च्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे १६ वर्षीय...

‘जिजाऊ ब्रिगेड’चा हुंडाबळी रोखण्याचा संकल्प, पहा सविस्तर

महाराष्ट्र जिजाऊ ब्रिगेडच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आढावा बैठक अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगर येथे जिजाऊ ब्रिगेड...

“युद्ध तुम्ही सुरू केलं, पण आता… ; इराणचा अमेरिकेला कडक इशारा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या इराण-इस्रायल लष्करी संघर्षात काल...

साईभक्तांसाठी आनंदाची बातमी: आता वेळ वाचणार, संस्थानकडून नवा निर्णय

शिर्डी / नगर सह्याद्री - साई संस्थानच्या या निर्णयामुळे सामान्य साईभक्तांना मोठा दिलासा मिळणार...